पुणे : मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे आधारवड आणि मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक शांताराम बापू कुंजीर यांचे आज (मंगळवार) पहाटे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात निधन झाले.
शांताराम बापूंचा अल्प परिचय
बापूंचे वडील स्मृतिशेष महादेव कुंजीर विहिरीच्या खोदकामाच्या सुरुंगाला बत्ती देण्याचे काम करीत असत. एक दिवस सुरुंगाला बत्ती दिल्यानंतर पाठीमागे वळाल्यानंतर त्यांना अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत बापू लहान असताना वडिलांचा अकाली मृत्यूमुळे संसाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली आणि संघर्षमय जीवनाची सुरुवात झाली.. मुलांचे वडीलांचे छत्र हरपले, त्यामुळे बाप आणि आई अशा दोन्ही भूमिका या मातेला पार पाडाव्या लागल्या.. मोलमजुरी करून खेड्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे जिकिरीचे झाल्यामुळे दोन लहान मुले आणि आई असे हे कुटुंब पुण्यात आले. मुले संघर्ष करण्याच्या वयात येईपर्यंत आईने मिळेल ते काम करून मुलांचे संगोपन सुरू केले. आईच्या मदतीसाठी दोघे भाऊ काबाड कष्ट करू लागली.. मोठा मुलगा रामचंद्र मिळेल ते काम करून आईला मदत करू लागला आणि लहान मुलगा शांताराम बापू यांनी आई आणि मोठ्या बंधूंच्या मदतीने वाडिया कॉलेज मधून आपलं शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर पुण्यात सिक्युरिटी गार्ड, पेपर टाकणे, दुधाच्या बाटल्या पोहोचविणे असे मिळेल ते काम करू लागले.
शांताराम कुंजीर यांनी वेगवेगळ्या 20 ठिकाणी नोकरी केली या काळात मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कामास सुरुवात केली आणि मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष विजयकुमार ठुबे साहेबांच्या माध्यमातून 2005 मध्ये संभाजी ब्रिगेड मध्ये कार्यरत झाले. मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर फोडल्याचा गुन्हा शांतारामबापूंवर होता. विविध संघटनांच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, D.Ed. च्या विद्यार्थ्यांचा स्टॅयपेंड चा प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, नवोदित लेखकांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी आत्तापर्यंत दहा पुस्तकांचे प्रकाशन असे सामाजिक काम बापूंनी केले आहेत. संभाजी ब्रिगेड च्या विचारांनी प्रेरित होऊन नोकरीला रामराम ठोकला आणि व्यवसायाला सुरुवात केली. प्रचंड काबाडकष्ट करून बापूंनी त्यांच्या कुटुंबाला सोन्याचे दिवस मिळवून दिले आणि या संघर्षमय आयुष्याचा शेवट आज दि 05 मे 2020 रोजी झाला. आज पहाटे ही बातमी समजली.++ दुःखद बातमी ++
कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते मा. शांताराम बापू कुंजीर, पुणे यांचे काल रात्री उशिरा हृदय विकाराने दुःखद निधन झाले आहे. दिवंगत नेते शांताराम बापू मराठा महासंघ, मराठा सेवा संघ , मराठा क्रांती मोर्चा सह विविध पुरोगामी चळवळीचे प्रणेते होते. मराठा आरक्षण सह शेकडो आंदोलनात सहभागी होते. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकदा जेल मध्ये जावे लागले. दिवंगत शांताराम बापू मराठा समाजातील पूर्ण वेळ काम करत होते…
शांताराम बापू यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नाही तर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. ते महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना पुणे येथे हक्काचे आधार होते. या शब्दात मसेस संस्थापक ऍड पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार