Lockdown च्या काळात सगळ्या जास्त त्रस्त झालेत ते दररोज दारु पिण्याची सवय असलेले लोक. दारुची दुकाने बंद असल्याने त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे देशभर या काळात अनेक दारुची बंद दुकाने चोरट्यांनी फोडली. तर अनेक लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तर केरळमध्ये काही जणांनी आत्महत्या केल्याच्याही घटना समोर आल्या. तर अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे जावं लागलं. दारुमुळे सरकारच्या तिजोरीत मोठा करही जमा होतो. त्यामुळे आसाम सरकारने अखेर दारुची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आसाममध्ये 13 एप्रिलपासून दारुची किरकोळ विक्रिची दुकाने सुरू होतील. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहणार आहेत. प्रत्येक दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी अशी अट सरकारने घातली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या तळीरामांना आता आसाम सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. तर कोरोना आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारच्या तिजोरीत दोन पैसे जमा होणार आहेत.
Assam Government has allowed the opening of retail liquor outlets from April 13. The notification states that all liquor shops shall remain open from 10amto5:00pm on the permitted days, and follow social distancing. pic.twitter.com/4D6vpLvwaq
— ANI (@ANI) April 12, 2020
देशभरात कोरोनाचा (Coronavirus) फैलाव झपाट्याने वाढत असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाचा (Covid – 19) फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमधील लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली आ