अकोट (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील अकोलखेड व पणज मंडळच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आज दि . 9/9/2019 रोजी जिल्हाकृषी अधिक्षक साहेब यांना मृग संत्रा बार बाबत विमा मिळणे करिता निवेदन दिल आहे. सन 2019 ते 2020 मधे एचडीएफसी अग्रो जनरल इन्शूरन्स या कंपनी द्वारे शेतकर्यांनी संत्रा मृग बहारचा विमा काढल असुन यावर्षी सतत अती पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे संत्रा मृग बहाराची 70 ते 80 टक्के बहाराची गळण झालेली आहे. त्यामूळे वरिल अकोलखेड व पणज मंडळ या दोन्ही मंडळामधे संत्रा उत्पादक शेतकर्याचे अतोनात नुकसान झालेले असुन आपण तलाठ्या मार्फत व कृषीअधिकारी यांच्या मार्फत संत्रा धारक शेतकर्याच्या शेतातील संत्राची पाहणी करुन व पंचनामे करुन शेतक र्यांना एचडीएफसी कंपनी व शासना कडून संत्रा मृगबहार गळतीची नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अशा आशयाचे निवेदन आज रोजी जिल्हाकृषी अधिकारी अकोला यांना देण्यात आले आहे. सदर निवेदन देतेवेळी सुनिल रमेश लाठोर, शशिकांत गोपालसिंग गयधर, वासुदेव पांडूरंग ढगेकर, सुभाष जानराव सरोदे, दिपक बापुसिंग गयधर, मधुसुधन रामभाऊ वाघमारे, दिपक दादाराव जायले, विलास शामराव वाघमारे यांच्यासह बहूसंख्य शेतकरी यांच्या सह्या आहेत.