तेल्हारा (किशोर डांबरे ): कोरोनाच्या पादुर्भावाने संपूर्ण जगात दहशत माजवली असतांना कोरोना चे रुग्ण भारतात आढळल्याने संपूर्ण देशात कर्फ्यु लावण्यात आला आहे.अशातच महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात कलम १४४ लावून संचारबंदी करण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास देवरे यांनी घराच्या बाहेर पडाल तर पोलिसी खाक्याला सामोरे जावे लागेल असा इशारा तालुक्यातील जनतेला दिला आहे.
कोरोनाच्या रोगाने संपूर्ण देशाला अडचणीत टाकले असून कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्वतोपरी उपाययोजना राबवित असतांना चोवीस तास झटणारा असा विभाग म्हणजे पोलीस विभाग हा आपल्या कर्तव्यप्रति कोरोनाचा पादुर्भाव वाढू नये म्हणून चोवीस तास आपली कर्तव्य बजावली जावो म्हणून तसेच संचारबंदी चे उल्लंघन होऊ नये म्हणून तहान भूक हरवून शहरासह गावागावात कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी झटत असतांना नागरिक मात्र प्रशासनाला प्रतिसाद योग्य प्रकारे देत नसल्याने जमाव करून विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागत आहे नागरिकांनी या कोरोना रोगाला व रोगाच्या पादुर्भावाला समजून घेऊन तो किती भयानक आहे हे समजून सहकार्य करावे अन्यथा पोलिसांना घराच्या बाहेर पडल्यास पोलिसी खाख्य दाखविला जाईल असा इशारा ठाणेदार विकास देवरे यांनी दिला आहे.