* तळेगाव व मनात्री येथील नागरिकांचा निवेदनाद्वारे मागणी करून दिला ईशारा
तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील तळेगाव वडणेर,व मनात्री शिवारात 200 एक्कर वर होणाऱ्या आय .आर बी (भारत राखीव बटालियन क्र.5)कॅम्प इतरत्र पळवून नेला तरी सादर कॅम्प तालुक्यातच ठेवण्यात यावा अशी मागणीचे निवेदन तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले मागणी मंजूर न झाल्यास विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला
तालुक्यात होणारा भारत राखीव बटालियन कॅम्प पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी सीसा उदेगाव व हिंगणा शिवार ता अकोला येथे पळवून नेला त्यामुळे आमच्या तालुक्यातील होणारा विकास थांबला तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उपलब्ध होणारा रोजगार थांबला यामुळे तरुण पिढीवर उपासमारीची वेळ येणार आहे ज्या मुद्यावर सदर कॅम्प ला मंजुरात मिळाली होती तेथे जाऊन राखीव बटालियन कॅम्प च्या सामदेशक व महानिरीक्षक यांनी प्रत्येक्षात जागेवर जाऊन पाहणी केली व सकारात्मक अहवाल दिल्यामुळेच कॅम्प ला मंजुरी मिळाली असताना ऐनवेळी हा कॅम्प दुसरी कळी वडविल्यामुळे तालुक्यातील जनतेवर अन्याय झाला आहे त्यामुळे जनता नाराज झाली आहे सदर कॅम्प परत तालुक्यात आणला नाही तर तालुक्याचा विधानसभा निवळणुकी वर बहिष्कार टाकण्यात येईल व बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा निवेदनात देण्यात आला निवेदनावर नयनाताई मनतकार, रमेश ताथोड, विशोम्बर ताथोड,शिवशंकर डिगोळे, श्रीधर मनतकार, किशोर ताथोड, कैलास मनतकार, मंगेश लासुरकर,संतोष काळे संदीप ताथोड इत्यादी गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत










