तेल्हारा (प्रतिनिधी) -तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर येथील पूर्वनियोजित भारत राखीव बटालियन कॅम्प शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात हलविण्याचे कटकारस्थान सुरू झाल्यामुळे हा तालुक्यावर अन्याय असून येथील युवकांच्या रोजगारावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे तो हाणून पाळण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे शिवसेना तेल्हारा तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड यांनी सांगितले
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर येथे होणारा( आय.आर .बी.) भारत राखीव राखीव बटालियन कॅम्प क्र.५ आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी देण्यात आलेल्या मान्यतेनुसार अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव व हिंगणा येथे निर्मिती होणार आहे त्यामुळे हा तालुक्यावर अन्याय आहे हा प्रकल्प इतरत्र इतरत्र वळविल्या गेल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकाना मिळणाऱ्या रोजगारावर गदा आली आहे आधीच या तालुक्यात कोणत्याही प्रकारची रोजगाराची संधी येथील युवकांना नाही त्यामध्ये आता तळेगाव वडनेर येथे सदर कॅम्प बद्दल संबंधी त अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल दिल्यामुळे च कॅम्प ला मंजुरी मिळाली असतांना ऐनवेळी हा प्रकल्प इतरत्र पडविण्यात आला हा तेल्हारा तालुक्यावरच न्हवे तर संपूर्ण आकोट मतदारसंघावर हा अन्याय झाला आह या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी या महत्वपूर्ण विषया कडे दुर्लक्ष केले असल्यामुळे हा प्रकार घडला आहे हे दुःखाची बाब आहे या मध्ये पालकमंत्री यांनी सुध्दा तेल्हारा तालुक्यावर अन्याय केला आहे त्यामुळे तेल्हारा तालुक्यातीवर झालेल्या अन्याया विरुध्द व येथील युवकांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे यावर आमदार व पालकमंत्री यांनी पुनर्विचार करावा अशी मागनी सुध्दा शिवसेना तेल्हारा तालुका प्रमुख विजय पाटिल मोहोड यांनी केली आहे










