अकोला,दि.३– कोविड संसर्गानंतर गुंतागुंत होऊन रुग्णाच्या शरिरात अंतर्गत अवयव कार्यप्रणालीत अडथळे निर्माण होतात. काहीवेळा मुत्रपिंडाने (किडनी) काम करणे बंद केल्यास, रुग्णांना कोविड उपचारासोबत डायलिसीस करणे आवश्यक असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डायलिसीस युनिटने या काळात मोलाची कामगिरी बजावत ७० हून अधिक रुग्णांना १०६ डायलिसीस सेवा दिली व त्यांना जीवनदान दिले.
कोविडची दोन वर्षे ही साऱ्यांचीच परीक्षा पाहणारी होती. जागतिक महामारी असलेल्या या आपत्तीने प्रशासन ते सामान्य नागरिक साऱ्यांचीच कसोटी घेतली. वैद्यकीय तज्ज्ञांचे तर ज्ञान,कसब, संयम सारेच पणाला लागले. कोविड उपचारादरम्यान येणारी सर्वात कठीण स्थिती म्हणजे संसर्ग आटोक्याबाहेर गेल्यावर अंतर्गत अवयवांचे एक एक करुन निकामी होत जाणे. अशा वेळी बाह्य उपचारांवर शरिरातील या निकामी झालेल्या अवयवांचे काम पूर्ववत करणे हे डॉक्टरांपुढे एक जिकरीचे काम होऊन बसते. उदा. श्वसन संस्था निकामी होऊ लागल्यावर व्हेंटिलेटरचा वापर करणे इ. मुत्रपिंड निकामी होणे; ही एक अशीच वैद्यकीय समस्या उपचारांदरम्यान सोसावी लागली. काही रुग्णांची मुत्रपिंडे उपचारादरम्यान निकामी होत. असे जवळपास ७० रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या लाटेत आढळून आले.
अशा रुग्णांना डायलिसीस उपचार द्यावे लागतात. यासंदर्भात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी माहिती दिली की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे डायलिसीसची पाच संयंत्रे आहेत. त्यातील चार ही विधानसभा सदस्य आ.रणधीर सावरकर यांच्या आमदार निधीतून मिळालेली असून एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आहे. कोविड रुग्णांवरील उपचारासाठी त्यातील दोन संयंत्रे वापरण्यात आली. कोविड आयसीयु मध्ये ही यंत्रे स्थापित करुन अंतर्गत अवयव निकामी होण्याची समस्या भेडसावणाऱ्या रुग्णांसाठी ही वापरण्यात आली. ७० रुग्णांना मुत्रपिंड निकामी होण्याची समस्या निर्माण झाली. अशा रुग्णांना मग डायलिसीस देण्यास ही संयंत्रे कामी आली. त्यातील जवळपास सर्वच रुग्णांना त्याचा लाभ होऊन त्यांना जीवनदान मिळाले. काही रुग्णांना मात्र अधिक गुंतागुंत निर्माण होऊन म्युकरमायकोसिस वगैरे सारख्या अतिजटील समस्यांमुळे मृत्यू आला. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे,असेही डॉ. गजभिये यांनी सांगितले.
याशिवाय ज्या रुग्णांना नियमित डायलिसीसची आवश्यकता असते,अशा रुग्णांना सेवा देणेही सुरुच होते. हे काम अन्य दोन संयंत्रांवर सुरु असते. तेथे आतापर्यंत १५० हून अधिक डायलिसीस झाले आहेत. हे कामही अव्याहतपणे सुरु असते. त्यासाठी डायलिसीस तंत्रज्ञ व अन्य वैद्यकीय पथक अहोरात्र परिश्रम घेत असते. हे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. प्रशांत मालविया, डॉ. रितू मोटवानी, तंत्रज्ञ रितू देशमुख, साजिद शेख, नंदकिशोर बाजड, अधिपरिचारिका जयश्री बढे, रुपाली पिंजरकर यांचे पथक कार्यरत असते.
कोविडचा सामना करतांना डॉक्टर्सना अक्षरशः योद्ध्यांप्रमाणे अहोरात्र झुंजावे लागले. रुग्णांचे मुत्रपिंड निकामी झाल्याने करावा लागणारा हा एक अनोखा समर प्रसंग असतो, त्यासाठी डायलिसीस युनिटने मोलाची कामगिरी बजावली आणि अनेकांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
कोविड संसर्गानंतर गुंतागुंत होऊन रुग्णाच्या शरिरात अंतर्गत अवयव कार्यप्रणालीत अडथळे निर्माण होतात. काहीवेळा मुत्रपिंडाने (किडनी) काम करणे बंद केल्यास; रुग्णांना कोविड उपचारासोबत डायलिसीस करणे आवश्यक असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डायलिसीस युनिटने या काळात मोलाची कामगिरी बजावत ७० हून अधिक रुग्णांना १०६ डायलिसीस सेवा दिली व त्यांना जीवनदान दिले.
कोविडची दोन वर्षे ही साऱ्यांचीच परीक्षा पाहणारी होती. जागतिक महामारी असलेल्या या आपत्तीने प्रशासन ते सामान्य नागरिक साऱ्यांचीच कसोटी घेतली. वैद्यकीय तज्ज्ञांचे तर ज्ञान,कसब, संयम सारेच पणाला लागले. कोविड उपचारादरम्यान येणारी सर्वात कठीण स्थिती म्हणजे संसर्ग आटोक्याबाहेर गेल्यावर अंतर्गत अवयवांचे एक एक करुन निकामी होत जाणे. अशा वेळी बाह्य उपचारांवर शरिरातील या निकामी झालेल्या अवयवांचे काम पूर्ववत करणे हे डॉक्टरांपुढे एक जिकरीचे काम होऊन बसते. उदा. श्वसन संस्था निकामी होऊ लागल्यावर व्हेंटिलेटरचा वापर करणे इ. मुत्रपिंड निकामी होणे; ही एक अशीच वैद्यकीय समस्या उपचारांदरम्यान सोसावी लागली. काही रुग्णांची मुत्रपिंडे उपचारादरम्यान निकामी होत. असे जवळपास ७० रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या लाटेत आढळून आले.
अशा रुग्णांना डायलिसीस उपचार द्यावे लागतात. यासंदर्भात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी माहिती दिली की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे डायलिसीसची पाच संयंत्रे आहेत. त्यातील चार ही विधानसभा सदस्य आ.रणधीर सावरकर यांच्या आमदार निधीतून मिळालेली असून एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आहे. कोविड रुग्णांवरील उपचारासाठी त्यातील दोन संयंत्रे वापरण्यात आली. कोविड आयसीयु मध्ये ही यंत्रे स्थापित करुन अंतर्गत अवयव निकामी होण्याची समस्या भेडसावणाऱ्या रुग्णांसाठी ही वापरण्यात आली. ७० रुग्णांना मुत्रपिंड निकामी होण्याची समस्या निर्माण झाली. अशा रुग्णांना मग डायलिसीस देण्यास ही संयंत्रे कामी आली. त्यातील जवळपास सर्वच रुग्णांना त्याचा लाभ होऊन त्यांना जीवनदान मिळाले. काही रुग्णांना मात्र अधिक गुंतागुंत निर्माण होऊन म्युकरमायकोसिस वगैरे सारख्या अतिजटील समस्यांमुळे मृत्यू आला. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे,असेही डॉ. गजभिये यांनी सांगितले.
याशिवाय ज्या रुग्णांना नियमित डायलिसीसची आवश्यकता असते,अशा रुग्णांना सेवा देणेही सुरुच होते. हे काम अन्य दोन संयंत्रांवर सुरु असते. तेथे आतापर्यंत १५० हून अधिक डायलिसीस झाले आहेत. हे कामही अव्याहतपणे सुरु असते. त्यासाठी डायलिसीस तंत्रज्ञ व अन्य वैद्यकीय पथक अहोरात्र परिश्रम घेत असते. हे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. प्रशांत मालविया, डॉ. रितू मोटवानी, तंत्रज्ञ रितू देशमुख, साजिद शेख, नंदकिशोर बाजड, अधिपरिचारिका जयश्री बढे, रुपाली पिंजरकर यांचे पथक कार्यरत असते.
कोविडचा सामना करतांना डॉक्टर्सना अक्षरशः योद्ध्यांप्रमाणे अहोरात्र झुंजावे लागले. रुग्णांचे मुत्रपिंड निकामी झाल्याने करावा लागणारा हा एक अनोखा समर प्रसंग असतो, त्यासाठी डायलिसीस युनिटने मोलाची कामगिरी बजावली आणि अनेकांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.