अमरावती – कोरोना महामारीने संपूर्ण जगभरामध्ये थैमान घातलेले आहे व यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच क्षेत्रातील व्यवहार बंद झालेले आहेत परिणामी अनेकांच्या आर्थिक उत्पन्नाची साधने बंद झाली आहेत. यामुळे अनेक आर्थिक व मानसिक समस्यांना विद्यार्थी व पालक वर्ग सामोरे जात आहे. पालक वर्गाला त्यांच्या पाल्यांच्या भविष्याची चिंता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.
आज दिनांक २३/१०/२०२० रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,अमरावती महानगर तर्फे विभागीय उपसंचालक भावनासमोर तीव्र निदर्षने करण्यात आले व राज्य सरकार च्या नामुशकी चा तीव्र शबदात निषेध करत मा.विभागीय उपसंचालक यांच्याशी चर्चा करत सर्व बाबींवर सकारात्मत विचार करत त्वरीत सर्व प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात याव्या असे सांगण्यात आले.
उशिरा प्रवेश सुरू झाले असताना, इयत्ता ११ वी, व पदवीचे प्रथम वर्ष ते अभियांत्रिकीचे थेट द्वितीय वर्षांच्या प्रवेश प्रक्रिया गेल्या सप्टेंबर महिन्यापासून रखडलेल्या आहेत. आधीच कोविड व पावसाने घातलेले थैमान यामुळे राज्यातील जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. त्यातच प्रवेश प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थी व पालवर्गामध्ये प्रचंड तणाव असून त्यांच्यात रोषाचे वातावरण आहे. राज्यातील विद्यार्थी हित जपता, राज्यातील सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,अमरावती महानगर ने विदर्भ प्रदेशमंत्री रवी दांडगे व महानगरमंत्री सौरभ लांडगे यांच्या नेतृत्वात मा.विभागीय उपासंचालक यांच्या कडे केली.