अकोट (देवानंद खिरकर )-अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या बघता त्यावर कठोर उपाय योजनांची आवश्यकता आहे.परंतु गत तीन महिन्याच्या लॉक डाऊन मुळे व्यापारी व कामगार वर्ग चिंतेने ग्रासलेला आहे. आता थोडाफार सुरळीत सर्वांचा रोजगार चालू झाला असतानाच जनता संचारबंदी मुळे त्यांचा रोजगार डुबणार आहे.सध्या शेतीची कामे ऐन भरात आहेत.फक्त बियाणे व खते भेटल्यावर त्यांची अडचण संपत नसून,शेती कामासाठी लागणारे अवजारे व त्यांचे सुटे भाग तसेच दुरुस्तीची कामे खोळंबनार आहेत व या संचार बंदीच्या आगीत शेतकरीसुद्धा होरपळला जाणार आहे.कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अकोटचे प्रशासन समर्थ आहे. व त्यांनी आज पर्यंत सिद्ध केले आहे.मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणे, वेळेवर दुकान बंद न करणे, इत्यादी कारणांसाठी त्यांनी जास्तीत जास्त दंड आकारावा वेळप्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केल्यास बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी होणार नाही व अत्यावश्यक कामांचा खोळंबा सुद्धा होणार नाही.