तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथे गेल्या काही महिन्यात भुरट्या चोरट्यांनी दहशत माजवली असून भुरटे चोर शहरातील पान टपऱ्या टार्गेट करून रोख रक्कम साफ करत आहेत. काल रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन पान टपऱ्याना हात साफ केला असून अद्याप याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून पान टपऱ्यांना टार्गेट करून गल्ल्यावर हाथ साफ करण्याचा सपाटा भुरट्या चोरट्यांनी लावला असून गेल्या दीड महिन्यांपूर्वी शहरातील दोन पान टपऱ्या फोडल्या होत्या तर काल रात्री शहरातील स्टेट बँक जवळील यादव पान पॅलेस तर मुख्य टावर चौकात असलेल्या रमेश पान मंदिर फोडून हजारो रुपयांची रोख रक्कम पळवली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी एका हेअर सलून दुकान फोडले होते मात्र चोरटे फक्त नगद रकमेवर हात साफ करत असून रक्कम मोठी नसल्याने कुठलाही दुकान मालक तक्रार देत नसल्याने भुरट्या चोरांची हिम्मत वाढली आहे. तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवरे हे सी सी टी व्ही फुटेज च्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्य चॉकतील दुकाने फोडल्या जात असल्यामुळे यामध्ये पोलीसांच्या रात्रीच्या गस्तीवर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण केल्या जात आहे.