वाडेगांव (डॉ शेख चांद)- इंदीरा नगर ,वाडेगांव येथे राहत असलेल्या सिध्दांत शुद्धोधन डोंगरे वय २३ वर्ष या शेतमजूर युवकाने रवीवार दि १o नौव्हेंबर रोजी रात्री ७ः३० च्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली , तो शेतीचे कामे करीत होता. आत्महत्याचे कारण अजुन पर्यंत समजु शकले नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले . त्याच्या पश्चात वडील, एक मोठा भाऊ , बहीन असा आप्त परीवार आहे.तर सिध्दार्थ नगर ,वाडेगांव येथे राहत असलेल्या चंद्रमणी नारायण जंजाळ वय ४६ वर्ष या शेतमजूर व्यक्ती ने रवीवार दि १o नौव्हेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता च्या दरम्यान किटक नाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली, त्यांचा मृत्यु उपचारासाठी अकोला नेत असतांना अर्ध्या मदात त्यांचा मृत्यु झाला ते शेतीचे कामे करीत होते.
मृतक चंद्रमणी जंजाळ यांनी घरकुल चा दुसरा हप्ता कधी मिळेल , हताला कामधंदा मिळत नाही, तसेच तिन्ही विवाहीत मुलींना दिवाळी साठी घरी आनले असता मुलींना व नातवंडाला आपल्या येथे राहायाला घर सुद्धा नाही या विवचनेमुळे आत्महत्या केल्याची चर्चा नागरीकांन मध्ये होती. परंतू आत्महत्याचे कारण अजुन पर्यंत समजु शकले नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले . त्यांच्या पश्चात , एक मुलगा, तीन मुली , नातवंड असा आप्त परीवार आहे. पुढील तपास वाडेगांव पोलीस करीत आहे, असे एपीआय महादेव पडघन यांनी सांगीतले.