गाडेगांव प्रतिनिधी (गोकुळ हिंगणकार): तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात उडीद.मुग.सोयाबीन.ज्वारी.कपासी.पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे त्यामुळे कसे जगावे अशा विवंचनेत बळीराजा सापडलाय आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे मुग.उडीद.एक महीन्याअगोदर खराब झाले होते त्यावर विमा ज्या शेतकऱ्यांनी काढला होता मात्र विमा कंपनी च्या अधिकारी यांनी त्यासंबंधी कोणतेही दखल घेतली नाही पंचनामा केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पिक विमा कंपनी च्या संभ्रम निर्माण झाला सतत पावसामुळे सोयाबीन.ज्वारी .कोंब फुटल्या मुळे आता शेतकऱ्यांच्या हातचे हे पिक सुध्दा गेले आहे.विमा कंपनी कोणताही सव्है व अर्ज स्विकारण्याचा आदेश झालेला नाही शेतकऱ्यांना ४८ तासांच्या आत अर्ज दाखल करावा लागतो अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून कोणत्याही प्रतिसाद मिळत नसल्याची वस्तूस्थिती दिसत आहे.
” शेतकऱ्यांच्या मुखाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे त्यामुळे शासनाने सव्है करून ओला दुष्काळ जाहीर करावा”
विजय सदाशिव बोर्डे
शेतकरी गाडेगांव
“तेल्हारा तालुक्यातील सोयाबीन.ज्वारी.कपासी या पिकांचा पंचनामा करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.उदया पासून पंचनामा करण्याचे काम सुरू होईल”
मिलिंद वानखडे
तालुका कृषी अधिकारी