तेल्हारा (विलास बेलाडकर)- परतीच्या पावसाने शेतातील सोयाबीन ज्वारी बाजरी कपाशी यासह अनेक पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले हाती आलेले पिक सरसकट वाया गेले एवढ्या मोठ्या प्रमाणात वाया गेलेल्या पिकांची पाहणी आज अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मा ना डॉ रणजीत पाटील यांनी आज तेल्हारा तालुक्यात खापरखेड येथिल देविदास सावरकर आणि दहिगाव येथिल शेतकर्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली पाहणी करूण तत्काळ तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांना लवकरात लवकर सर्वे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले यावेळी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर तहसिलदार विजय सुरडकर तालुका कृषी अधिकारी मिलींद वानखडे एकनाथ ताथोड नितिन सावरकर दिलीप फोकमारे रूपेश पोटे सदाशिव खोटरे ज्ञानेश्वर कुटाले नथ्थुजी शेळके अविनाश बहाकर याच्या सह पटवारी कृषीसहाय्यक ग्रामसेवक आणी शेतकर्यांची उपस्थिती होती