हिवरखेड (दीपक रेळे)- विकास वंचित अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसर कायमच विकासापासून वंचित राहिलेला आहे. मागच्या वेळी मोदी लाटेची सुनामी आली आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर सामान्य जनतेच्या अपेक्षा वाढल्या आणि आपल्या विकास वंचित गावाच्या आणि जिल्ह्याचा कायापालट होईल अशी रास्त अपेक्षा नागरिकांना होती. त्याअनुषंगाने हिवरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते धिरज संतोष बजाज यांनी विविध विषयांशी संबंधित निवेदने प्रधानमंत्री मोदीजींना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीसांना पाठविली होती. त्यातील काही मुद्दे केंद्र शासनाच्या तर जास्त मुद्दे राज्य सरकारच्या अधीन होते. प्रधानमंत्री कार्यालयाने या निवेदनांची तात्काळ दखल घेऊन यावर महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्य सचिवांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. परंतु महाराष्ट्र शासनाद्वारे पीएमओ च्या निर्देशांवर काही अपवाद वगळता कागदी घोडे नाचविण्याशिवाय कोणतेही ठोस कार्य केले नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
नरेंद्र मोदी हे प्रचंड मताधिक्य घेऊन दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक दशकांपासून अकोल्याला केंद्रीय मंत्रिपद मिळाले नसल्याने हा जिल्हा विकासापासून कोसो दूर असल्याची बाब हेरली. आणि अकोला जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी संजय धोत्रे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये अकोला जिल्ह्याचे कर्तव्यतत्पर मंत्री म्हणून नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांचा समावेश आधीपासूनच आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात आणि केंद्रात दोन्ही जागी आपल्या भूमीपुत्रांची नेमणूक असल्याने विकासाचे मुद्दे अत्यंत जलदगतीने मार्गी लागतील असा ठाम विश्वास अकोला जिल्ह्यासोबतच हिवरखेड वासियांना आहे.
येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वीच प्रधानमंत्री कार्यालयाने निर्देश दिलेल्या परंतु वर्षानुवर्षे रेंगाळत असलेल्या विकास कामांना मार्गी लावून दोन्ही मंत्री महोदयांनी प्रधानमंत्र्यांचा विश्वास सार्थकी ठरवावा अशी मागणी जोर धरत आहे. संबंधित विकासकार्याचे मूल्यमापन करूनच जनता विधानसभेचे मतदान करील यात मात्र शंका नाही.
प्रलंबित अथवा अपूर्ण असलेल्या प्रमुख मागण्या
अकोट-खंडवा-इंदोर ब्रॉडगेज प्रकल्प पूर्णत्वास नेणे
हिवरखेड-तेल्हारा-शेगाव ह्या नवीन रेल्वेमार्गा करिता सर्व्हेक्षण करून निर्मिती करणे
हिवरखेड-तुकईथड (बुऱ्हाणपूर) हा महाराष्ट्र मध्यप्रदेश ला जोडणारा सर्वात शॉर्टकट मार्गाचे नूतनीकरण करून त्याला नॅशनल हायवे चा दर्जा देणे
हिवरखेड परिसरात कृषी आधारित केंद्र शासनाचा मोठा प्रकल्प उभारणे.
प्रस्तावित हिवरखेड नवीन तालुका निर्मिती करणे.
हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करणे.
हिवरखेड येथे विज्ञान शाखेच्या शिक्षणाची सोय करणे.
हिवरखेड परिसरातील राज्य मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांचे दर्जेदार नूतनीकरण करणे
सर्वच भूमिहीन नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करणे.
हिवरखेड मार्गे इंदोर,खंडवा, पुणे,औरंगाबाद, शिर्डी इत्यादी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करणे.
हिवरखेड ते अकोला एसटी च्या थेट चार ते पाच फेऱ्या सुरू करणे.
अधिक वाचा : प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी मेळाव्यात शेतकरी हिताचे ठराव, हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola