तेल्हारा [ विशाल नांदोकर] – काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात जवळपास 44 जवानांना वीरमरण आले तर अनेक जवान गंभीर जख्मी झाले आहेत. या हल्ल्यातील शहीद जवानांना शहरातील सर्व नागरिकांनी जातपात, पक्ष, धर्म बाजूला ठेवून एकोपा दाखवीत श्रद्धांजली वाहिली तर गंभीर जखमी जवानासाठी लवकर बरे व्हावे म्हणुन देवाला साकडे घातले तसेच अशा घटनानंतर भारतीय नागरिंकांचे रक्त सळसळत असल्याने या शहिद जवानांच्या रक्ताच्या एक एक थेंबाचा बदला घ्या अशी भावना सर्व सामान्य नागरिकांनी व्यकत केली उरी नंतर काश्मीरमधील पुलवामा जिल्हयातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर आत्मघाती हल्ला केला आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येताच, त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात 44 जवान शहीद झाल्याने शहिद जवानांना श्रद्धांजली देऊन शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन संकटाच्या वेळी सर्व भारत एक येतो याचे उदाहरण पाकिस्तानला देत पाकीस्तान मुर्दाबाद नारे देत दहशदवाद्याच्या आत्मघाती भ्याड हल्याचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. तसेच जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, अशी भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच उरी प्रमाणे लष्कराने त्या हल्ल्याला मिशन ‘सर्जिकल स्ट्राईक’ हे नाव दिले होते. या मिशन अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यातआला. त्यानंतर, भारतीय सैन्याची ताकत जगभरातील देशांनी अनुभवली. त्यामुळे, आताही उरीप्रमाणेच अवंतीपुरा हल्ल्याचाही बदला घ्या, अशी भावना व्यक्त होत आहेत. तर, आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होऊन जाऊ द्या अशी मागणीही नागरिकानी केली शहीद जवानाना सर्वधर्मिय, सर्वपक्षीय, सर्व समाजबांधवांनी सामुहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतड्याजवळ करण्यात आले होते. यावेळी शहरातील सर्व नागरिक सहभागी झाले होते.
*पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या तेल्हारा बंद*
जम्मू काश्मीरमधील पुलवामा मध्ये आतंकवादी हल्ल्यात जवळपास ४२ जवान शहीद झाले.आज तेल्हारा येथे सायंकाळी तेल्हारा शहरातील समस्त देशभक्तांनी स्थानिक टॉवर चौक येथे सामूहिक श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहरातील नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी उद्या तेल्हारा बंद चे आवाहन केले असून उद्या तेल्हारा शहर सायंकाळ पर्यन्त कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे