तेल्हारा(प्रतिनिधी): जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान ला ठेचून ,देशद्रोह्यांना शोधून कडक कारवाई करण्यात यावी अशा मांगणीचे निवेदन 16 फेब्रुवारी ला देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांना तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत प्रसन्न पप्पूसेठ सोनटक्के या लहान मुलाच्या हस्ते देण्यात आले तसेच पाकिस्तान च्या निषेधार्थ तेल्हारा शहर सर्वांनी कडकडीत बंद ठेवले
पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले या घटनेमुळे देश हळहळला आहे आता बदला घेण्यासाठी पाकिस्तान ला ठेचण्याची वेळ आली आहे तसेच आतंकवादयाना आश्रय देणाऱ्या देशद्रोह्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे मोठ्या प्रमाणात स्फोटकं स्थानिक मदतीशिवाय आणणे शक्य नाही त्या मुळे दहशतवाद विरोधात व देशद्रोह्यांन विरोधात एकजूट होण्याची आवश्यकता आहे व त्याच्यांवर ठोस भूमिका घेऊन कारवाई करण्यात यावी या साठी संपूर्ण देश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तरी आपण पाकिस्तान वर सर्वच बाबतीत निर्बंध लावून पाकिस्तान ला धडा शिकवून आजपर्यंत देशद्रोह्यांन पासून झालेले व होणारे नुकसान ताडण्यासाठी देशद्रोह्यांनचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मांगणी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या कडे तहसीलदार मार्फत देशभक्त नागरिकांनी निवेदन देऊन केली .
या वेळी गजानन मोरखडे,प्रहार चे जिल्हा अध्यक्ष तुषार पुंडकर,युवा क्रांती विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर, शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे,काँग्रेसचे अनंत सोनमाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिलीप पिवाल, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सतीश जैस्वाल,युवासेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे ,विवेक खारोडे,नगर सेवक विक्की मल्ल, गोवर्धन पोहरकार, निलेश धनभर ,मंगेश ठाकरे, सुमित गंभीरे,शेखर भूजबले,राहुल झापर्डे,विशाल फाटकर, निलेश जवकार, विशाल नांदोकार राजेश वानखडे, प्रवीण वैष्णव,विशाल भूजबले, विठ्ठल मामनकार,शाम खारोडे,चंद्रकांत मोरे,पपुसेठ सोनटक्के, संतोष राठी,संतोष साबळे, राम वाकोडे,महेमुदभाई कुरेशी,सचिन महल्ले,मनीष गोयनका, गौरव बावस्कर, गणेश शर्मा , इत्यादी सामाजिक व राजकिय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते आज पाकिस्तान ने घडवून आणलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तेल्हारा शहर कडकडीत बंद देवण्यात आले भारत माता की जय वंदे मातरम,नारे देण्यात आले तसेच पाकिस्तान च्या विरोधात नारे देण्यात आले