• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, September 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बाबो.. भारत आणि पाकिस्तानवर येणार ‘हे’ मोठे संकट.. पहा, शास्त्रज्ञांनी काय दिलाय इशारा..

adil by adil
May 19, 2022
in Featured, आंतराष्ट्रीय, संपादकीय
Reading Time: 1 min read
154 2
0
Temperature-summer (1)

Temperature-summer (1)

27
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

दिल्ली – उत्तर आणि पश्चिम भारतातील लोकांना यावेळी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, हवामान बदलामुळे उत्तर-पश्चिम भारत आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) विक्रमी उष्णतेची भीती व्यक्त केली जात आहे. या भागांना शंभरपट अधिक उन्हाचा तडाखा सहन (Increase heat in india-pakistan) करावा लागणार आहे. हवामान बदलाच्या परिणामांमुळे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ब्रिटिश हवामानशास्त्र कार्यालयाच्या अभ्यासात हवामानातील बदलाबाबत नवे खुलासे झाले आहेत. यामध्ये संशोधकांनी सांगितले की, हवामान बदलाचा परिणाम उत्तर-पश्चिम भारत (India) आणि पाकिस्तानमधील हवामानावर होत आहे. या भागात 2010 च्या विक्रमी तापमानानंतर आता दर तीन वर्षांनी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा उत्तर-पश्चिम भारतातील तापमान (Temperature) येत्या काही दिवसांत नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

यापूर्वी, स्कॉटिश शास्त्रज्ञ स्कॉट डंकन यांनी ट्विट करून माहिती दिली होती की, आगामी काळात भारत आणि पाकिस्तानच्या काही भागात तापमान 50 अंश सेंटीग्रेडपर्यंत पोहोचेल. मार्चमध्येच भारत आणि पाकिस्तानमध्ये उष्मा किती तीव्र होता हे ग्राफिक्सच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न स्कॉटने केला होता.

भारतीय हवामान विभागाच्या मते, वायव्य आणि मध्य भारतात 19 मे पासून तीव्र उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) नवीन टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, बिहार आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे देशातील सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जम्मू आणि काश्मीरमध्ये काही ठिकाणी सामान्य कमाल तापमान (3.1°C ते 5°C च्या रेंजमध्ये) दिसले.

विभागाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागांमध्ये वेगळ्या ठिकाणी अशीच उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 19 मे रोजी उत्तर प्रदेश, 20 आणि 21 मे रोजी मध्य प्रदेश, 19 आणि 20 मे रोजी पंजाब, हरियाणा आणि 18 ते 21 मे रोजी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमध्ये शनिवारी तापमान 51 अंश सेंटीग्रेडवर पोहोचल्यानंतर अलीकडच्या काही दिवसांत या प्रदेशाला मान्सूनपूर्व उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला आहे. या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा उष्मा वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान कार्यालयाच्या ग्लोबल गाईडन्स युनिटने दिला आहे. पाकिस्तानमधील काही ठिकाणी कमाल तापमान 50 अंश सेंटीग्रेडपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, रात्रीचे उच्च तापमान कायम राहण्याची शक्यता आहे.

या अभ्यासात कॉम्प्युटर सिम्युलेशनची (Computer Simulation) मदत घेण्यात आली. संगणक सिम्युलेशनमध्ये, दोन परिस्थितींमधील हंगामी घटनांची तुलना केली जाते आणि भविष्यात किती वेळा घडण्याची शक्यता आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. या भागात एप्रिल आणि मेमध्ये 1900 नंतरचे सर्वाधिक तापमान होते. हा अभ्यास एप्रिल आणि मे 2010 मध्ये उत्तर-पश्चिम भारत आणि पाकिस्तानमध्ये उष्णतेच्या लाटेवर आधारित होता. शास्त्रज्ञांनी सांगितले की, जर हवामान बदल मोठ्या प्रमाणावर होत नसतील, तर असे टोकाचे तापमान दर 312 वर्षांत एकदाच दिसले असते, परंतु सध्या परिस्थिती खूप प्रतिकूल आहे.

Tags: big crisisIndiaPakistanscientists
Previous Post

घरगुती गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

Next Post

पॉर्न रॅकेटप्रकरणी राज कुंद्रावर ‘ईडी’ने दाखल केला गुन्‍हा

RelatedPosts

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’
Featured

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर
Featured

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Next Post
raj_kundra_

पॉर्न रॅकेटप्रकरणी राज कुंद्रावर 'ईडी'ने दाखल केला गुन्‍हा

लोहारी येथे  ई -श्रम कार्ड व पॅन कार्ड मोफत कॅम्पचे आयोजन,शिवराम डिक्कर यांचा उपक्रम….!

लोहारी येथे ई -श्रम कार्ड व पॅन कार्ड मोफत कॅम्पचे आयोजन,शिवराम डिक्कर यांचा उपक्रम....!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.