तेल्हारा: (शुभम सोनटक्के) दिनांक 7 नोव्हेंबर 2021 पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे. या एकमेव मागणीसाठी सम्पूर्ण महाराष्ट्र सह तेल्हारा आगर बस कर्मचारी उपोषण करीत आहेत कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये प्रवासी माय-बाप यांची गैरसोय होऊ नये.
म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या एकमेव रास्त मागणीचा सहानुभूतीपूर्वक व संविधानिक न्यायाच्या दृष्टिकोनातून विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे. अशी मागणी राज्य परिवहन तेल्हारा आगारातील कर्मचारी यांनी मागणी केली आहे. व 11 नोव्हेंबर ला तेल्हारा आगारातील कर्मचाऱ्यांनी तेल्हारा आगारा तर तहसिल कार्यालय पर्यन्त मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी तेल्हारा आगार परिसरातून ते तहसिल कार्यलय पर्यन्त निघालेल्या हा मोर्चा शांततेत पार पाढण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी सर्व एसटी बस कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.