• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 29, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जुलै महिन्यात आतापर्यंत ९ लाख २६ हजार १४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ

Team by Team
July 13, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
जुलै महिन्यात आतापर्यंत ९ लाख २६ हजार १४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ
58
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यातील 52 हजार 427 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 11 जुलै पर्यंत राज्यातील 58 लाख 35 हजार 920 शिधापत्रिका धारकांना 9 लाख 26 हजार 140 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 427 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 5 लाख 22 हजार 258 क्विंटल गहू, 4 लाख 3 हजार 884 क्विंटल तांदूळ, तर 5 हजार 202 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 1 लाख 27 हजार 612 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

हेही वाचा

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 6 जून पासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण 1 कोटी 39 लाख 17 हजार 36 रेशनकार्डवर मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 6 कोटी 29 लाख 45 हजार 432 लोकसंख्येला 31 लाख 47 हजार 270 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे मे व जून महिन्यासाठी आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 66 हजार 126 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे.

आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून या 2 महिन्यांसाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ दिला जात आहे. आतापर्यंत 1 लाख 23 हजार 373 क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे.

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

Tags: अन्नधान्यरेशनकार्ड
Previous Post

हिवरखेडच्या हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर विशेष पथकाची कारवाई,३५ लाखाच्या मुद्देमालासह 18 जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले

Next Post

आज जिल्हयात कोरोनाच्या मीटरमध्ये १५ रुग्णांची भर,एकूण आकडा १८९४ पार

RelatedPosts

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू
Featured

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

July 28, 2025
कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद
Featured

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

July 28, 2025
राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी
Featured

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

July 25, 2025
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन
Featured

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

July 24, 2025
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा
Featured

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

July 23, 2025
बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
Featured

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

July 23, 2025
Next Post
चाचणी

आज जिल्हयात कोरोनाच्या मीटरमध्ये १५ रुग्णांची भर,एकूण आकडा १८९४ पार

मोबाइल

अकोल्यातील बाजारपेठेतून ‘चायना’ मोबाइल हद्दपार!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

July 28, 2025
जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

July 28, 2025

पोलीस स्टेशन तेल्हारा हद्दीतील अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणा-या पखवाज वादकास अटक!

July 29, 2025
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

July 24, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.