• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, November 18, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सधन लाभार्थ्यांनो अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे निमा अरोरा यांचे आवाहन

Our Media by Our Media
February 4, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, योजना, विदर्भ
Reading Time: 1 min read
351 3
0
Rashan Card
51
SHARES
2.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 4 : – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार पात्र असलेल्या अंत्‍योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य सवलतीचा लाभ दिला जातो. परंतु ज्या पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही, अशा सधन नोकरदार, व्यवसायी व शेतकरी लाभार्थ्यांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

राज्यामध्ये दि. 1 फेब्रुवारी 2014 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध अटीनुसार पात्र असलेल्या अंत्‍योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रति माह 35 किलो व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रतिमाह पाच किलो अन्नधान्याचा सवलतीच्या दराने लाभ देण्यात येतो. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या शिधापत्रिकाच्या आधार सीडींग मुळे योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता योग्य लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आधारसीडींग मुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित व मयत इत्यादी लाभार्थ्यांना वगळण्यात आले असले तरी पात्र लाभार्थ्यांमधील ज्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने या योजनेमधून बाहेर पडावे. यामुळे गरजू लाभार्थी इष्टांक मर्यादेमुळे योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत अशा लोकांना योजनेचा लाभ मिळेल.

हेही वाचा

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

25 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अंत्‍योदय अन्न योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही, अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडण्यासाठी दि. 25 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत पात्र लाभार्थ्यांनी स्वेच्छेने दि. 25 फेब्रुवारीपर्यंत  अन्‍नधान्‍य योजनेतुन बाहेर पडावे. याकरीता तहसील कार्यालय व रास्‍तभाव दुकानदार यांच्याकडे अर्ज करावा. त्यानंतर स्‍थानिक दक्षता समिती ग्रामपंचायत मार्फत अन्‍नधान्‍याचा लाभ घेणारे अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेवून संबंधित तहसील कार्यालयास अहवाल सादर करतील.

नोकरवर्ग, व्यवसायी व सधन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेवू नये

शासकीय व निमशासकीय नौकरीत असणारे लाभार्थी, खाजगी नौकरी, व्यवसाय करणारे ज्यांचे उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे असे लाभार्थी, चार चाकी वाहन असणारे लाभार्थी, पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणारे सधन शेतकरी व पेंशनधारक लाभार्थ्यांनी अन्नधान्य सवलतीच्या योजनाचा लाभ घेवू नये.

अपात्र लाभार्थ्यांवर होणार कार्यवाही

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अपात्र असलेला लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्यास अशा लाभार्थ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955चे कलम 9 अन्वये पाच मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंडासह दोन्ही शिक्षेस पात्र राहिल. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल होईल. नियमशिधापत्रिका संबंधात कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधिताना दिले आहे.

Previous Post

पोस्ट विभागाचा उपक्रम; बँक खाते आधार संलग्न सुविधा गावातच:12 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम

Next Post

कापसी येथील बालकांना कायदेविषयक मार्गदर्शन

RelatedPosts

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
Next Post
Kapasi

कापसी येथील बालकांना कायदेविषयक मार्गदर्शन

गटाई योजना

गटई कामगारांना मिळणार पत्र्याचे स्टॉल;15 फेब्रुवारी अर्ज मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.