तेल्हारा (विकास दामोदर)- तेल्हारा तालुक्यातील नेर पिवदळ सांगवी ऊमरी परिसरातील शेतकरी यांचे अतिवृष्टीमुळे चानका नदि व पुर्णा नदिला मोठ्या प्रमाणात पुर आल्याने शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा ताई भोजने वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष मा. प्रमोदजी देडवे, सभापती मा. पंजाबराव वडाळ, पंचायत समिती सदस्य आम्रपाली, गुरु ता. महासचिव अशोकराव दारोकार, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पद्मा ताई, गुरु ग्राम पंचायत सरपंच सौ. दोड नायब, तहसीलदार राजेश गुरव, मंडळ अधिकारी सावग विस्तार अधिकारी ठोंबरे, पटवारी खान, ग्राम सचिव चतारे, पत्रकार सुनिल तायडे, यांनी अतिवृष्टी पुरा मुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांन सोबत संवाद साधला व लवकरच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.