अकोला :- पावसाळ्याचा एक महिना उलटला तरी अजुनी पेरणी करणे योग पाऊस पडलेला नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरणे खोळंबल्या असून ज्यांनी पेरण्या केले त्यांच्यावर दुबार पेरणया करण्याचे संकट आले आहे . त्यामुळे शेतकरी हतबल झाले. जून महिन्याच्या सुरुवातीला तीन-चार वेळा चांगला अवकाळी पाऊस पडला यावेळी पावसाळा चांगला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता त्यामुळे काही शेतकर्यांनी पेरणी पेरण्या आटोपल्या होत्या परंतु या पेरणी झाल्यानंतर पाऊस गायब झाला त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात बिजाकुर आता कोमजले आहेत अजूनही काही दिवस पाऊस येणार नसल्याचे.. आजच्या बातम्या समोर येत आहेत त्यामुळे ज्या शेतकर्यांनी पेरणी केली त्यांच्या पेरण्या उलट होण्याच्या मार्गावर असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे आधीच अडचणीत असताना शेतकऱ्यांनी कर्ज काढून लाखो रुपये बियाणे व खते विकत घेऊन पेरणी केली वाया गेल्याने शेतकरी पुरता हतबल झालेला आहे. याशिवाय आता पेरण्या उशिरा होणार असल्याने पुढील पिकांच्या उत्पादन क्षमतेवर त्यांचा परिणाम होऊन कमी झडती घेऊ शकते म्हणजे आधी दुबार पेरणीचे
संकट नंतर पेरणी करूनही उत्पादन कमी यामुळे शेतकरी सापडणार आहे..