तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील चारही बाजूच्या रस्त्याबाबत शासन प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना त्रास होत असून सदर रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात यावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार आजपासून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय तेल्हारा समोर आमरन उपोषणाला बसले आहे.
तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा ते आडसूळ, तेल्हारा ते हिवरखेड, तेल्हारा ते वणी वारुळा, तेल्हारा ते वरवट या चारही बाजूंच्या मुख्य रस्त्यांची अत्यंत दैनीय अवस्था झाल्यामुळे व रस्त्यांचे कामे संबंधित ठेकेदाराने अर्धवट सोडून सदर रत्यावर पिवळी माती टाकल्यामुळे व रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे तालुक्यातील नागरिकांसह रुग्णांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून अनेकांना जीव गमवावा लागला तर मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यामुळे या अपघातास अनेकांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. तसेच या रस्ता बांधकामाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करण्यात आली त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे.
झाडे तोडल्यानंतर नव्याने झाडे लावण्याचे कोणतेही प्रयोजन संबंधित ठेकेदाराने केले नाही. या सर्व कारणाबाबत विशाल नांदोकार यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना यापूर्वी रस्त्यांचे कामे त्वरित करणेबाबत निवेदन देवून कामामध्ये प्रगती न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. संबंधित सर्व रस्त्यांचे सर्व काम बंद असल्यामुळे विशाल नांदोकार आज दि २६ जून २०२१ पासून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय तेल्हारा समोर सकाळी १० वाजता पासून आमरण उपोषणास बसले आहेत याबाबत त्यांनी तहसीलदार व पोलीस स्टेशन तेल्हारा यांना कळविले असून तसेच या अर्जाचे प्रतीलिपि . ना. बच्चुभाऊ कडू पालकमंत्री, अकोला जिल्हाधिकारी अकोला कार्यकारी अभियंता सा. बांधकाम अकोला सार्वजनिक उपविभागीय कार्यालय, तेल्हारा ठाणेदार पो स्टे, तेल्हारा यांना कडविले आहे.उपोषण स्थळी शेकडो नागरिकांनी अद्यपर्यंत भेट देईन समर्थन दिले आहे.