अकोट(प्रतिनिधी) : अकोला जिल्ह्यात, कोव्हिड चाचणीचे प्रमाण वाढविल्यामुळे, स्थानिक प्रशासनामार्फत ,चालू आठवड्यात, केव्हाही “कडक – लॉकडाऊन ” ची घोषणा होऊ शकते . त्यामुळे, त्याचा लहान मोठया सर्वच उद्योग धंद्द्यावर गंभीर परिणाम होण्याची चिन्हे आहेत . हॉटेल व्यवसाय, दुकान व्यवसाय, सलून व ड्रॉयक्लिन व्यवसाय, बांधकाम व्यवसाय सर्वच कामे बंद झालीत. तर त्याचा सर्वात जास्त फटका, हातावर पोट असणाऱ्या मजूरांना, पारंपारिक धंदा करणाऱ्या बारा बलुतेदारांना बसणार असून, रोज मजूरी करून, सायंकाळी शिदा खरेदी करून, उदरनिर्वाह करणाऱ्या, मजूरांची चूल बंद पडणार असल्याचे कटूसत्य आहे . तेव्हा मा . मुखमंत्री महोदयांनी, मातोश्री बाहेरील, झोपडपट्टी आणि पालावर राहणाऱ्या, दारिद्ररेषे खालील, दिव्यांग व निराधार, छोटे मोठे फेरीवाले, भररस्त्यावर दुकाने थाटून, किरकोळ विक्री करणारे, लहान धंदेवाले, लगीनसराईत व्यवसाय करणारे, सुप, डाले,, परडी, टोपले विकणारे व्यवसायिक, थंड पाण्याचे माठ आणि लग्नाचे मडके गाडगे विकणारे कुंभार, बिछायत केंद्रे, मंडप डेकोरेशन, आचारी, कॅटरर्स, फोटोग्राफर, सनई चौघडा, बॅन्ड पार्टी, गोंधळ जागरण पार्टी, उन्हाळ्या निमित्ताने सुरु झालेल्या रसवंत्या, आईस्क्रिम पार्लर व त्यावर रोज मजूरीवर काम करणारे मजूर, बांधकाम साहित्य व किराणा दुकानाबाहेर हातगाड्यांवर मजूरी करणारे हमाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल, बेरोजगार होऊन, त्यांना नजरकैदेत असल्या प्रमाणे आपल्या झोपडी मध्ये स्वतः ला उपाशीतापाशी डांबून घ्यावे लागणार आहे . त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अगोदर, त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे . त्यांच्या करीता स्वस्त धान्य दुकानातून मोफत रॅशन व गॅस सिलेंडर आणि त्यांना रोख रक्कम देऊन,आर्थिक मदत करावी .अन्यथा यापुढे महाराष्ट्रात व त्या सोबतच आपल्या जिल्ह्यातही उपासमारीचे बळी जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .असे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .