मुंबई : राज्यातील वीजग्राहकांना दिलासा देणारे निर्देश देत वीज नियामक आयोगाने 1 एप्रिलपासून वीज दर सुमारे 2 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण सामान्य नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. नियामक आयोगाने सुनावणी दरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत.
मार्च 2020मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च 20 ते मार्च 21 पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी 10 टक्के वीजदर कमी करण्यात आले. तर या वर्षी 1 एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीजदर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दृष्टिक्षेपात दरकपात
महावितरण । रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून 1 टक्के तर बिगर रहिवासी, कंपनी, उद्योगांना 2-5 टक्के.
बेस्ट । रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून 0.1 टक्के तर बिगर रहिवासी, कंपनी, उद्योग यांना 0.3-2.2 टक्के
अदानी । रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून
0.3 टक्के तर बिगर रहिवासी, कंपनी, उद्योग
यांना 1.4-1.6 टक्के
टाटा । रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून 4.3 टक्के तर बिगर रहिवासी, कंपनी, उद्योगांना 1.1.-5.8टक्के