अकोला(दीपक गवई)- विश्वशांती,अहिंसा आंदोलनाचे प्ननेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, अस्तेय, असंग्रह, ग्रामनिर्माण, ग्रामसफाई,निसर्गोपचार,खादी ग्रामोद्योग या विधायक रचनात्मक कार्यासाठी अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाने गुरुवार दि.११ व शुक्रवार दि.१२ फेब्रुवारी २०२१ ला गांधीसागर (नेरधामणा बॅरेज) ते गांधीग्राम सर्वोदय पदयात्रा आयोजित केली आहे.
दि.११ फेब्रुवारी ला दु.२ वाजता नेरधामणा येथील पूर्णा बॅरेज गांधीसागर जलाशयाचे पूजन करुन पदयात्रेचा शुभारंभ होईल.नेरधामणावाशीयांसोबत जलजागर करुन ही पदयात्रा नैराट वैराट कडे रवाना होईल.शेतकरी शेतमजुरांशी संवाद साधत सायंकाळी गोपाळखेड येथे मुक्काम व शेतकरी सभेत मार्गदर्शन होईल.दि.१२ ला सकाळी प्रभातफेरी व शालेय विद्यार्थ्यांशी व्यसनमुक्तीवर संवाद होईल सकाळी९वा महात्मा गांधी विद्यालय व महात्मा गांधी स्मारक स्मारक समितीचे वतीने आयोजित कार्यक्रमात अभिवादन व ११वाजता पूर्णा घाटावर महात्मा गांधी अस्थी विसर्जन स्मृती कार्यक्रमात या सर्वोदय पदयात्रेचा समारोप होईल.ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार,सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड,सचिव डाॅ.मिलींद निवाणे,श्रीकृष्ण वाघमारे,वसंतराव केदार,जयकृष्ण वाकोडे,वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष गोवर्धनदादा खवले,सचिव डाॅ.का.ज.दाते,विठ्ठलराव हिवरे,नितीन भरणे,गुरुचरण ठाकुर,महेश आढे,रोहीत तारकस,आकाश इंगळे यांचेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ,युवक पदयात्रेत सहभागी होत आहे.