तेल्हारा – कोविड १९ च्या परिस्थिती मुळे गेल्या ११ महिन्यांपासून राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. कोविडच्या परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात सुधार आले असून राज्य सरकारद्वारे दारूची दुकाने, मॉल, सिनेमागृहे व परिवहन सेवा तसेच राज्यातील पहिली ते पाचवी व नववी ते बारावी च्या शाळा सुरु करण्यात आल्या मग महाविद्यालयेच बंद का ? असा प्रश्न विद्यार्थी परिषद राज्य सरकार ला विचारत आहे.
महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करण्यात येत आहे परंतु त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे होताना दिसत आहे. ऑनलाइन पद्धतीचा वापर करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामुळे आपले महाविद्यालय नियमित सुरु करण्यात यावे अशी मागणी करत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तेल्हारा तर्फे स्थानिक डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालया चे प्राचार्य श्री गोपाल ढोले सर यांना निवेदन देण्यात आले. निवेदना वर नगर मंत्री कुणाल शेळके नगर उपाध्यक्ष प्रा.शरद मानकर सर,प्रा.स्वप्नील फोकमारे, प्रा.विशाल जलमकार,शुभम घाटोळ, संकेत घाटोळ,नागेश घाटोळ, रोशन बोंबटकार,मनीष डामरे,स्वप्नील आमले,अक्षय खारोडे , अजय पोहनकार,पवन मानकर, राजपाल वानखडे, रोशन विखे,मनीषा आमले, पायल राठी,गायत्री वानखडे,राणी मात्रे
इत्यादी सह शेकडो विध्यार्थ्यांच्या स्वाक्षरी आहेत