अमरावती -संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हे पाचही जिल्ह्याचे महत्वाचे तथा उच्च शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे. आजचा विद्यार्थी वर्ग आधीच विविध समस्यांनी ग्रस्त आहे. त्यात महाविद्यालयाकडे विध्यार्थ्याच्या जुन्या सत्राच्या गुणपत्रिका जमा करण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यामुळे विद्यापीठाला विद्यार्थ्यांचा अंतिम वर्षाचा निकाल देता येत नाही.कोरोनाच्या काळात विद्यार्थी स्वता जोखिम घेऊन विद्यापीठात येत आहेत. अजूनही अडीच हजार विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत. महाविद्यालयानी टीआर सुद्धा विद्यापीठाकड़े जमा केलेले नाहीत ही अतिशय गंभीर बाब असून महाविद्यालयांनी गुणपत्रिका जमा करने अपेक्षित असताना विद्यार्थ्याना नाहक त्रास देणाऱ्या महाविद्यालयांवर विद्यापीठ कायद्यानुसार कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ मनीष गवई यांनी केली आहे.त्यांच्या या मागणीचे विद्यार्थी संघटना, पालक संघटना, विद्यार्थी वर्गाकडून जोरदार स्वागत केल्या जात आहे. आगामी सिनेट सभेत हा मांडणार मुद्दा गाजणार असून विद्यापीठाने महाविद्यालयांशी संपर्क साधून महाविद्यालय विद्यापीठाला प्रतिसाद देत नाही. याबाबत कुलगुरूना कार्यवाही करण्याची मागणी देखील डॉ गवई यानी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार विद्यापीठाशी सलग्नित महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या आदेशांचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र महाविद्यालयाच्या मान्यता घेताना दिले आहे.विद्यार्थ्यांची सर्व प्रशासकीय व शैक्षणिक कामे महाविद्यालयीन स्तरावर होणे अपेक्षित आहे.परंतु याबाबत महाविद्यालयीन स्तरावर उदासीनतेचे धोरण पाहावयास मिळते. सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे.आधी विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परिक्षेची चिंता होती पण ही चिंता दूर होताच निकाल व गुणपत्रिका न मिळाल्याने पदवुत्तर प्रवेशाकरीता विद्यार्थी धडपड करीत असल्याचे चित्र दिसत असताना महाविद्यालयाकडे विध्यार्थ्याच्या जुन्या सत्राच्या गुणपत्रिका जमा करण्याचे काम सोपविण्यात आले होते.याशिवाय उन्हाली 2017 पासून महाविद्यालयानी ट्यबुलेशन रेकॉर्ड(टीआर) सुद्धा विद्यापीठाकड़े जमा केलेले नाहीत हेही काम देखील महाविद्यालयानी जबाबदारीने केले नाही. विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या सेमिस्टरचा निकाल असल्याशिवाय विद्यापीठाला विद्यार्थ्यांचा अंतिम वर्षाचा निकाल देता येत नाही.कोरोनाच्या काळात विद्यार्थी स्वता जोखिम घेऊन विद्यापीठात येत आहेत. विद्यार्थ्यांना स्वताचे पैसे खर्च करून विद्यापीठ गाठावे लागत आहे.आधीच लॉकडाउनने पालकवर्ग आर्थिक विवंचने सापडला आहे. शेतकरी हवालदिल झाला असताना त्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर गर्दी होतअसल्याने कोरोनाला निमंत्रण दिल्या जात आहे.
अजूनही अडीच हजार विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून महाविद्यालयांनी गुणपत्रिका जमा करने अपेक्षित असताना विद्यार्थ्याना नाहक त्रास देणाऱ्या महाविद्यालयांवर विद्यापीठ कायद्यानुसार कार्यवाही करावी व अशा महाविद्यालयांवर कार्यवाही करून त्यांची मान्यताच रद्द करावी अशी जोरदार मागणी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ मनीष गवई यांनी केली आहे.त्यांच्या या मागणीचे विद्यार्थी संघटना, पालक संघटना, विद्यार्थी वर्गाकडून जोरदार स्वागत केल्या जात आहे. 29 डिसे.च्या सिनेट सभेत हा मांडणार मुद्दा गाजणार असून विद्यापीठाने महाविद्यालयांशी संपर्क साधून महाविद्यालय विद्यापीठाला प्रतिसाद देत नाही हे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या विरुद्ध आहे.. याबाबत कुलगुरूना कार्यवाही करण्याची मागणी देखील डॉ गवई यानी निवेदनाद्वारे केली आहे. जर महाविद्यालयांना विध्यार्थ्याची काळजी नाही तर महाविद्यालय चालवायचे कुणासाठी असा सवाल देखिल विद्यार्थी संघटना, पालक संघटना, विद्यार्थी वर्गाकडून विचारल्या जात आहे. याबाबत डॉ गवई यानी कुलगुरूना निवेदन देऊन कार्यवाही कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आता कुलगुरु या विषयावर काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.