मुंबई : कोरोना काळात राज्यातील जनतेला वाढीव वीज बिलाला समोरे जावे लागले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारकडे वीजबील माफ करण्याची मागणी केली होती. पण दोन दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत मिळणार नसल्याचे जाहीर केले होते. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर ट्विट करुन टीका केली आहे.
एका पत्रकाराने लिहिले आहे, “माझे कुटुंब माझी जवाबदारी”चा यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना “माझे लाईट बिल माझी जवाबदारी”असं ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
महावितरणच्या ६७ हजार कोटींच्या थकबाकीने राज्य सरकारची चिंता वाढवली आहे. वसुलीसाठी नव्याने मोहीम राबविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.