पातूर (सुनिल गाडगे)- मौजे शिर्ला येथील गट क्रमांक ७३ मधील पाच एकर जमिन शहिद कैलास निमकंडे यांच्या कुटूंबियांना त्वरित त्यांच्या नावे करून द्यावी अशी मागणी पातुर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवकुमारसिंह बायस यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांच्याकडे केली आहे.
मौजे शिर्ला येथील शहिद जवान कैलास कांशीराम निमकंडे यांच्या कुटूंबियांनी शासनाकडे मागणी करूनही त्यांना नियमाप्रमाणे मंजुर झालेली जमीन अद्याप मिळालेली नाही.तरी त्यांनी पसंती दर्शविलेली जमीन त्यांच्या वर अवलंबून असणारे वृद्ध वीर माता पिता यांना लवकरात लवकर देण्यात यावी.असा ठराव शिर्ला ग्रामपंचायत ने तहसील कार्यालयास सादर केलेला आहे.
तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने ही पाच एकर जमीन शहिद कुटुंबियांना देण्यासाठी विषयानुसार प्रस्ताव सादर केल्याचे दि.२७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या पत्रात म्हटले आहे.सदर जमीनीची भूमी अभिलेख कार्यालय पातुर मार्फत दि.०३ जून २०१९ रोजी मोजणी सुद्धा झालेली आहे.
आजपावेतो सदर शहिद जवानाच्या कुटूंबियांना जमीन मिळालेली नाही.तरी आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करून त्वरीत शहिद जवानांच्या कुटूंबियांना जमीन मिळवून द्यावी, ही विनंती.
शहिद जवानांचे कुटूंबिय वयोवृद्ध असुन त्यांना शासन दरबारी फे-या माराव्या लागतात,हे पुर्णत: निषेधात्मक आहे.तरी त्यांच्या बाबत त्वरीत निर्णय घ्यावा.
राज्य सरकारने काढलेल्या सैनिकांना गायरान व गुरचरण जमीन कुणालाही न देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो,तसेच या शासन निर्णयामध्ये बदल करून शहिद जवानांना जमीन देण्याबाबत उल्लेख करावा,आमच्या मागणीबाबत त्वरीत निर्णय घेऊन शहिद जवानांच्या कुटूंबियांना जमीन मिळवून न दिल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने उपोषणास बसण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तसेच २८ आॅगस्ट २०२० ला पातुर शहर व तालुक्यातील विविध विकास कामासंबधी निवेदन दिले होते त्याच्यावर ही सकारात्मक चर्चा झाली आणी त्यातील काही आवश्यक काम करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार ना.संजय धोत्रे यांच्या सुचना पत्राद्वारे करण्यात आल्या.
निवेदन देतांना वीरपिता कांशीराम निमकंडे, ठाकुर शिवकुमारसिंह बायस, नितिन खंडारे, रूपेश फलके आदी मान्यवर उपस्थीत होते.