दहीहंडा (कुशल भगत)- पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते व पूल सतत नादुरुस्त होतात व बऱ्याच ठिकाणी पुरामुळे पूल व रस्ते यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. रस्त्यांची व पुलांची पाहणी करून दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची असलीतरी अधिकारी वर्ग या बाबीकडे गांभीर्यपूर्वक पाहत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेला दळणवळणांसाठी अडचणी सामना करावा लागतो. अकोट तालुक्यातील कुटासा, पनोरी, बाम्बरडा येथील पुलाची पूर्णता दयनीय अवस्था झाल्यामुळे अनेक गावासह शेतकऱ्यांचा आपल्या शेताशी सम्पर्क तुटल्याने अनेकांच्या पेरण्या थांबल्या आहेत. या बाबीची माहिती ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना दिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीची लगेच काळजी घेत कुटासा गावात जाऊन त्या पुलाची पाहणी केली. पाहणी दरम्यान सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता सरनाइक, उप अभियंता भुमरे, या अधिकार्यांना नादुरुस्त पुलाची तात्काळ दुरुस्ती करून देण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्यासोबत शिवाजीराव देशमुख,विजयसिह सोळंके जिल्हा परिषद सदस्य गोपाल पेटे, पवन बूटे, विनोंद मंगळे, प्रमोद राठी ,मोहन सावरकर, रामभाऊ भांडे म्हतोडीकर, मंगेश ताडे, मधुकर पाटकर, दत्तुभाऊ पाटील, विनोद पेटे,गजानन थोरात, बळूभाऊ ठाकूर, विलास साबळे, गणेश वाघमारे, मोहनभाऊ राठी, विवेक भरणे, पवन वर्मा सह अधिकारी वर्ग व ग्रामस्थ हजर होते.