चोहट्टा बा(कुशल भगत)- पावसाळा सुरू झाला असतानाही खरीप हंगामासाठीचे पीक कर्ज आद्यपही शेतकऱ्यांना मिळाले नाही.शेतकरी दररोज कर्जासाठी बँकांच्या पायऱ्या तुडवतात तरीही बँकांच्या ताटकळत धोरणामुळे आवश्यक त्यावेळी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही.त्यामुळे अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांनी स्टेट बँकेच्या चोहोटा बाजार शाखेची अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे तक्रार केली. शेतकऱ्यांची तक्रार येताच आज 30 जून रोजी आमदारांनी स्टेट बँकेत येऊन 2 तास ठिया मांडला. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्या जात असल्याने संतप्त झालेल्या आमदारांनी बँकेच्या प्रभारी शाखा प्रमुखांची चांगलीच खरडपट्टी काढली.व शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारीचा पाढाच वाचला. बँकेत किती लाभार्थी आहेत , किती लाभार्थ्यांचे पीक कर्जासाठी अर्ज आलेत ,व कितीना आतापर्यंत कर्ज दिले. याची साधी माहिती आमदारांनी विचारली असता ती सुद्धा बँकेच्या प्रभारी शाखाप्रमुखाना देता आली नाही. यावर आश्चर्य व्यक्त करत आमदारांनी लगेच वरिष्ठांना फोन करून शाखेच्या कारभाराची माहिती दिली.शाखा प्रमुख सुटीवर ,बँकेतले कर्मचारी सुटीवर ,फक्त एक रोखपाल व प्रभारी शाखाप्रमुखच हजर होते.ही परिस्थिती पाहुन शेतकऱ्यांच्या समस्येवर आक्रमक भूमिका घेतलेल्या आमदार सावरकर यांना बँक व्यवस्थापणाला उत्तर देता देता गेली. बँकेत वातावरण चांगलेच गरम झाले होते. नंतर वरिष्ठांनीच लाभार्थ्यांची पूर्ण माहिती दिली.एकूण 621 लाभार्थ्यांपैकी फक्त 150 लाभार्थ्यांच आतापर्यंत कर्ज मंजूर झाल्याचे बाब समोर आली.आज जणू आमदारांनी बँकेच्या कारभाराचा पंचनामाच करून टाकला. पीक कर्ज वाटपात हलगर्जी पण करणाऱ्याची गय केली जाणार असा दम वरिष्ठांना देत कर्ज वाटपची गती वाढविण्याचता सूचना दिल्या. बँकेच्या ताटकळत धोरणामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेवर कर्ज मिळत नाही त्यामुळेच शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि मनाने हतबल झालेले शेतकरी आत्महत्येसारख्या दुर्दैवी मार्गावर जाताना दिसून येतात या आत्महत्यांना सर्वस्वी बँकांचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप करीत आमदारांनी बँकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.