अकोला- संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर सर्व गोष्टींची विक्री करण्यास बंदी आहे. परंतु अकोला जिल्हयात आहोरात्र तंबाखू, गुटखा आणि मद्य विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गांजा, तंबाखू, गुटखा अशा पदार्थांचीदेखील मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. सर्वत्र ह्या पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्याने अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये ही विक्री करून नागरिकांची लूट केली जात आहे. गुटख्याची पुडी हवीय’’, ‘‘हो भेटेल ना’’, ‘‘कितीला आहे?’’, ‘‘पन्नास रुपये.’’ हा संवाद आहे, तंबाखू विक्रेत्यासोबतचा. सध्या केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी आहे. मात्र,जिल्ह्यात सर्रासपणे चौपट-पाचपट दराने तंबाखू आणि गुटख्याची विक्री होत असल्याचे उघड झाले. दुकानांमधून विकता येत नसल्याने फोनवरून वैयक्तिकरित्या भेट घेत किंवा घरातून विक्री केली जात असल्याचे समोर आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी तंबाखू, गुटखा व मद्याची बेकायदेशीर विक्री सुरूच आहे. काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू भेटणार नाही, पण तंबाखू, गुटखा उपलब्ध होईल, अशी स्थिती आहे. किराणामालाच्या दुकानांतून किंवा घरातून हा माल विकला जात आहे. संबंधित विक्रेता फोनवरून ऑर्डर घेत दहा रुपये किंमत असलेली तंबाखूची पुडी चाळीस रुपयांपासून ऐंशी रुपयांपर्यंत विकत आहेत.
करोनाचा प्रसार होण्यास मदत
काहीजण गुटखा विकत आहेत. परंतु खाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांचीही तलफ भागवली जात आहे. तंबाखू, गुटखा चघळणारे वाटेल तिथे थुंकत असल्याने करोनाचा प्रसार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील बार ची चॉकशी होनार का!
कोरोनाच्या धर्तीवर शासनाने बार बंद करून सील करण्यात आले मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा पुरवठा होत आहे.जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून अकोला जिल्ह्यातील शहरासह गावा गावात मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा होत आहे.जर बार सील केले आहेत तर विदेशी दारू सह देशी दारूचा पुरवठा कोठून होत आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोठ्या प्रमाणात तालुका स्तरावर सुद्धा विना चॉकशी कोणी फिरकू शकत नाही तर दारूचा पुरवठा होत कोठून आहे म्हणजेच बार मालकांनी दारूचा पुरवठा एकतर बार सील होण्याअगोदर काढला असणार नाहीतर छुप्या मार्गाने बार मधून सील केल्यानंतर दारू काढल्या जात असणार जिल्यातील बारचे स्टॉक रजिस्टर चेक करून चॉकशी करणे गरजेचे आहे.बार मालकांच्या घालमेल शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होणे तर शक्य नाही. विशेष म्हणजे बार मधील मद्याची नेहमीची जावक आणि बार बंद झाल्यानंतर बंद होण्याअगोदर किती प्रमाणात मद्याची विक्री झाली याची ताळेबंद होणे गरजेचे आहे. बेकायदेशीर दारू करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे अशी नागरिकांची मागणी आहे.
अधिक वाचा: अकोटातील शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टराची गैरहजेरी, रुग्णालय सोडले वाऱ्यावर