दिग्रस बु(सुनील गाडगे )- पातुर तालुक्यातील दिग्रस बु या गावामध्ये कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावातील ग्रामपंचायत, पोलीस पाटील, सार्वजनिक शिव जयंती, भीमजयंती समिती व ईतर सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातुन “ग्राम संरक्षक मित्र” हि संकल्पना निर्माण करून कोरोना सारख्या महामारी ला गावात प्रवेश न करण्या करिता गावातील तीस तरुणांनी स्वयंस्पुर्थीने पुढे येऊन कोरोना ला गावात येण्यास रोखन्या करिता “अँटी कोरोना पोलीस मित्र” तयार केले. हे संरक्षण मित्र स्वयंस्पुर्थीने अनेक दिवसांपासून गावाला या महामारीतून वाचविण्याकरिता अहोरात्र गावाच्या मुख्य प्रवेशद्वार तथा गावातील संपूर्ण वस्तीमध्ये, चौका चौकात आठ आठ तास डोळ्यात तेल घालून कुठलाही मोबदला न घेता गावाला या आजारापासून वाचवण्याकरिता कडक पहारा देत आहेत. त्याच प्रमाणे लोकांना समजेल त्या भाषेत घरो घरी जाऊन त्याच प्रमाणे गावातील चौका चौका मध्ये पोस्टर च्या माध्यमातून, जणजागृकतेचं काम करत आहेत. गावातील जबादार लोक स्वयंस्पुर्थीने संरक्षण मित्र यांना अल्पोहार, चहा, पाण्याच्या कॅन, व ईतर आवश्यक गोष्टी सावन गवई, अजित ताले यांच्या मार्फत आहेत त्या ठिकाणी पुरवून संरक्षण मित्र यांचे मनोबल वाढदिवन्यास मदत केली जात आहे. गावातील नागरिकांनी संरक्षण मित्र यांना हॅन्ड ग्लोस, स्यानिटायजर, मास्क, पुरवून संरक्षण मित्र यांची खबरदारी सुद्धा गावातील लोकांनी पार पाडली व अजून सुद्धा मदत करत आहेत. गावातील दोन्ही प्रवेशद्वारावर गावात प्रवेश करणाऱ्या लोकांची नोद वही तयार करण्यात आली असून सदर बाब सरपंच गोवर्धन डाबेराव, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील नितीन गवई यांच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहे. संरक्षण मित्र यांना ओळखपत्र दिल्या गेले. कोरोना आजाराची प्रथम तपासणी शिबीर आयोजित केले होते त्याचप्रमाणे गावातील लोक सुद्धा संरक्षण मित्र यांनी दिलेल्या नियमानुसार वागत आहेत त्या मुळे आत्ता पर्यन्त दिग्रस या गावात कोरोना सारख्या आजाराचा शिरकाव झाला नाही हि खूप अभिनंदनास पात्र बाब आहे.