अकोट (देवानंद खिरकर) – आक्टोंंबर,नोव्हेंबर,महीन्यात राज्यात पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याबाबत सर्वे करुन दुस्काळ जाहीर करण्यात आला होता. व शेतकर्यांना दुष्काळी मदत म्हणून हेक्टरी 8000 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथिल शेतकर्यांना अजुनही 8000 हजार रुपये मदत प्रत्यक्षात मीळालेली नाही. करिता वडाळी सटवाई येथिल शेतकर्यांनि मदत लवकर मिळन्यात यावी. या करिता अकोट येथिल नायब तहसीलदार गुरव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संदीप जगन्नाथ साबळे, अमीर अली असरार अली, बजरंग रेळे, बळवंत गंगाराम रेळे, संतोष श्रीराम गड्म, अ सईद अ जब्बार, अ निसार अ सलाम,अमित विजय डोबाळे, सुनिल विजय डोबाळे, गजानन डीगंबर गडम, अविनाश डीगंबर गडम, चंद्रकला गड्म, गजानन महादेव गडम, राजू महादेव गडम, गजानन श्रीरंग गडम, या सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.