पुणे – भिमा कोरेगांव प्रकरणी अटकेत असलेले बुध्दीजिवी शरद पवारांच्या एसआयटी तपासाच्या भूमिकेमुळे अधिक काळ जेल मध्ये अडकण्याची भिती निर्माण झाली आहे, असा आरोप वंचित बहूजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.
भिमा कोरेगांव प्रकरणी गेले दोन वर्षे पासुन बुध्दीजिवींना भाजप आणि फडणविसांनी अर्बन नक्सल म्हणून जेल मध्ये टाकले आहे.भिडे एकबोटेंना मात्र मोकळे रान आहे.गेली दोन वर्षे जेल मध्ये असलेल्या बुध्दीजिवींना सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकांव्दारे दिलासा मिळू शकत असताना भिडेंची पाठराखण करणा-या राष्ट्रवादीने एसआयटी कडे तपासाचा डाव टाकला.फडणविस आणि भाजपला अडचणीत टाकले असे दर्शविले जात असले तरी चार्ज फ्रेम होवू न देता बुध्दीजिवींना अडकवून ठेवण्यासाठी पवारांनी जाणीवपुर्वक सरकारला पत्र लिहील्याचा खेळ ऊभा केला.केंद्र सरकारने केंद्रीय तपास संस्थेकडे तपास वर्ग केला आहे. त्यामुळे तपासाच्या नावावर बुध्दीजिवींना अधिक काळ जेल मध्ये अडकविण्याचा पवारांचा डाव दृदैवाने यशस्वी ठरला आहे.
तपास यंत्रणाच्या घोळात जाणीवपुर्वक बुध्दीजिवींना अडकविण्याचे षडयंत्रात भाजपसह राष्ट्रवादी प्रामुख्याने सहभागी असून राष्ट्रवादी नेत्यांना पुज्य स्थानी असलेल्या मनोहर भिडे यांचे करीता हा डाव टाकण्यात आला आहे असा आरोप वंचित बहूजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8