अकोला(प्रतिनिधी)- पैसाळी कान्हेरी फिडरवरील शेतक-यांचा वीज पुरवठा हा पुर्वी रात्री ३ तास तर दिवसा ४ तास असायचा तो बदलून रात्री ४ वेळ करण्यात आल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त झाला आहे. रात्री अपरात्री जंगली प्राणी व साप विंचू यांचा सामना करावा लागत आहे. दिवसा ८ तासच वीज ऊपलब्ध केली जात आहे, त्या करीता रात्रीचा पुरवठा पुर्ववत न झाल्यास भारिप बहूजन महासंघाने आज वीज मंडळ कार्यालय बंद करण्याचा इशारा निवेदना व्दारे दिला.ह्यावेळी राजेंद्र पातोडे, शुध्दोधन इंगळे, दादाराव पवार, दिनकरराव पातोंड, राजेश ठाकरे, स्वप्निल आखरे, प्रशांत भातखडे, भारत निकोसे, सिहांसन जाधव, ञ्रषीकेष खंडारे, महादेव घाटे, प्रशांत डोंगरे, ऊमेश गवई, नवनित वानखडे, सचिन इंगळे, रंजित डोंगरे प्रामुख्याने हजर होते.