अकोला (प्रति)- नागरिकत्व दुरूस्ती कायदा रद्द करावा अशी मागणि उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला यांनी केली आहे. संसदेत गेल्या आठवड्यात मंजुर केलेला सुधारीत नागरीकत्व कायदा रद्द करावा केंन्द्र सरकारने सर्व सामान्य जनतेचा विरोध डावलुन बहुमताच्या जोरावर लोकसभेत देशविघातक असणारे नागरीकत्व दुरुस्ती विधायक (NRC) जबरदस्तीने मंजुर करुन घटनेची पायमल्ली केल्याने भाजप सरकारच्या हुकुमशाही पद्धतीला रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला विरोध करीत आहे हे विधेयक गैर संवैधानिक आहे.
भारताच्या संविधानानुसार धर्माच्या आधारावर नागरिकता देऊ शकत नाही संविधानानुसार देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समानता देण्यात येते. हे विधेयक कायदा केल्याने अखंड भारतातील शांत वातावरणाला धोका निर्माण होईल त्यामुळे हे विधेयक रद्द करा अशी मागणि रिपब्लिकन सेना युवक आघाडी जिल्ह्याच्या वतिने जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी दिलीप दंदी ( तालुका प्रमुख बाळापुर) महेन्द्र खंडारे (जिल्हा महासचिव), मिनाक्षी तायडे, सतिश (जिल्हा उपाध्यक्ष) तेलगोट, रोहीत सदांशिव (जिल्हा उपाध्यक्ष), सुबोध गवई, आकाश गवई, योगेश हिवराळे, गुणवंत इंगळे (जिल्हा सचिव), शोभाताई खडसे, उषाताई पखाले, मयुर सरदार (जिल्हा उपाध्यक्ष) आदी रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.