अकोला (प्रतिनिधी) – अकोला बार्शीटाकळी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असुन दररोज होणारे अपघात नित्याची बाब झाल्याने आज वंचितच्या वतीने प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक विभाग व राष्ट्रीय महामार्ग यांना आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याचे अल्टीमेटम आज दिले आहे.
बार्शीटाकळी अकोला मार्ग हा अपघात प्रवण मार्ग बनला आहे.परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग मंडळ दोन्ही विभागाला त्याचे सोयरसुतक नाही.त्यामुळे सातत्याने होणा-या अपघातामुळे अनेकांना जख्मी व्हावे लागले.वाहनांचे नुकसान होत आहे.अधिकारी मात्र त्याला बधत नाही.या विरोधात आज वंचितच्या वतीने प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी दोन्ही विभागाला आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याचा अल्टीमेटम दिला आहे.
आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू न केल्यास आधी ह्या दोन्ही विभागाला ताला ठोकण्याचा ईशारा दिला असून त्यावरही रस्त्याचे काम सुरू न झाल्यास या मार्गावरील सर्व गावातील नागरिक, वाहने व गुरे ढोरे रस्त्यावर आणुन चक्का जाम आंदोलनाचा ईशाराही ह्यावेळी देण्यात आला.