तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ग्राम दहिगाव येथे अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने वरली अड्डयांवर धाड टाकून दहा आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
तेल्हारा पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम दहिगाव अवताडे येथे ग्राम पंचायत जवळ सुरू असलेल्या वरलीच्या अड्ड्यावर आज दुपारी ३ वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून धाड टाकली असता वरिलीची खायवाडी व वरलीची हारजित करणाऱ्या दहा आरोपींना रंगेहाथ पकडून त्यांच्या कडून नगद ३९१० रुपये व मोबाईल अंदाजे १० हजार असा ऐकून १३ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून यामध्ये आरोपी सागर शेळके,राजू डोंगरे,अझर अतिफ शेख,पांडुरंग धरमकर,मोहन लोबडे,मनोहर गावंडे,राजू व्यास,प्रकाश टीये,एकनाथ भिवटे, विजय तायडे सर्व रा दहिगाव अवताडे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.त्यांच्या विरुद्ध तेल्हारा पोलीस ठाण्यात कलम महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ राजेश्वर सोनोने,हर्षद देशमुख,अनिल लापूरकर,सुभाष वाघ यांनी केली.सदर कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.