• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

adil by adil
May 18, 2020
in राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
देवेंद्र फडणवीस
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : शेती क्षेत्रावर हवामान बदलाचा आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे विपरीत परिणाम होऊन त्यामुळे कृषी उत्पादनात घट होते. ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ही परिस्थिती बदलता आल्यास त्याचा फायदा शेतीच्या शाश्वत विकासासाठी होईल, शिवाय शेतकऱ्यांच्या जीवनमानात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सेंटरच्या माध्यमातून या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सेंटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे हे केंद्र मुंबई सुरु केल्यामुळे त्याचा उपयोग करुन घेण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा शेती आणि जलसिंचन क्षेत्रासाठी वापर करण्यात येईल. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमतेबरोबरच अचूक परिणाम साध्य करण्यास मदत होणार आहे.कृषी क्षेत्रावर बदलत्या हवामानाचा दुष्परिणाम जाणवतो. सोबतच किडीच्या प्रादुर्भावाचा देखील कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम जाणवतो. अशा वेळी ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरुन हवामानाची वेळीच माहिती आणि किडीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी आपण उपाय करु शकलो आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती क्षेत्र शाश्वत झाल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी नक्कीच होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्यात भारत नेटच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतीपर्यंत फायबर ऑप्टिक टाकण्यात येत असून त्याद्वारे प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात 26 जानेवारी 2019 पर्यंत अजून 10 हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जातील. तंत्रज्ञानाच्या वापरातून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणतानाच शेती क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

अधिक वाचा : मराठा आरक्षण : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, विधानसभेत कृती अहवाल सादर

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: CM Devendra Fadanvis
Previous Post

महिलांच्या सुरक्षेसाठी आता ‘पॅनिक बटन चेन’, पोलिसांना लोकेशन कळणार

Next Post

पातुरच्या घरकूल योजनेची चौकशी करा – न्यायालय

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
SC

पातुरच्या घरकूल योजनेची चौकशी करा - न्यायालय

रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.