दानापूर (सुनिलकुमार धुरडे)- आषाढी महिन्यात पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी ची याञा भरते ,तसाच उत्सव गुरुपौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी दानापूर येथे व्हा वा या उद्देशाने येथे सुरू केलेल्या राधाकृष्णाची रास लिलेशी संबधीत लळित याञेची परंपरा गेल्या 200 वर्षा पासुन राजपुत घराण्यातील सरदार सिंह ठाकुर याच्या घरी पाळण्यात येते . गावातील लहान मुलांना राधा कृष्णाच्या वेशभुषेत सजवून गावातून त्यांची पारंपारिक वाद्य ढोला च्या भजनाने गावातुन राधाकृष्णा च्या ,विठ्ठल माऊलीच्या जय घोषात मिरवणूक काढण्यात येते . व नंतर त्यांना वान नदीच्या पात्रात बसवण्यात येते गावातील लोक त्याची पुजा करून प्रसाद वाटतात .त्यामुळे येथील वातावरणात एक भक्तिमय वातावरण व एक दिवशीय याञेचे स्वरूप प्राप्त होते . यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी ,खाद्यपदार्थांची दुकाणे मोठ्या प्रमाणावर थाटणयात आली होती . त्यानंतर सायंकाळी ढोला च्या दंग होऊन मोठ्या उत्साहाने गावातुन वाजत गाजत राधाकृष्णा च्या व विठू माऊलीच्या जय घोषात राधाकृष्णा ला गाव प्रदक्षिणा घालत सरदार सिंह ठाकुर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते .व नंतर कार्यक्रमाची सांगता होते. या याञे मध्ये राधाकृष्णा च्या वेशभुषेत कृष्णा गोतमारे या मुलाला कृष्ण तर आदित्य हागे ,अथर्व ढगे यांना राधाची वेशभुषेत सजविण्यात आले होते .गावातील मुलीची आवर्जुन उपस्थिती याच महिन्यात आषाढीचा सन येतो ,गावातील सर्व मुली या याञेला आवर्जून उपस्थित असतात .त्यामुळे गावातील प्रत्येकाच्या घरी एक आनंददायी वातावरण निर्माण झालेले असते .