तेल्हारा(ता.प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील दानापूर ग्राम पंचायत मधील शिक्षक कॉलोनी मधील रस्त्याचे कधी उजळनार भाग्य ज्यामुळे येथील शिक्षक कॉलोनी मध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास कमी होईल कधी त्यांच्या या रस्त्याचे भाग्य उजळनार असे तेथील नागरिक बोलत आहेत.
तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून दानापूर ग्रामपंचायत ओळखली जाते मात्र येथील गढूळ राजकारणापायी गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षक कॉलोनी मधील रस्ता या गडुळ राजकारणापायी झाला नाही.बऱ्याच वेळा या रस्त्या बाबत ठराव घेऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा मोठ्या थाटात पार पडला होता.मात्र ग्राम पंचायतीच्या वेळ काढू व आपापसातील मतभेदांमुळे हा रस्ता गेल्या कित्येक वर्षा पासून केला गेला नाही.फक्त आश्वासनाची ख्यरात वाटून येथील राहणाऱ्या नागरिकांची दिशाभूल करण्यात आली आहे.सदर शिक्षक कॉलोनी मध्ये जवळपास शिक्षित लोक असून बाहेर गावी नोकरी करून आपली कर्तव्य पार पाडत आहेत अशात त्यांच्या घरच्यांना सदर रस्त्याची बिकट परिस्तिथी झाल्याने बऱ्याच वर्षांपासून त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे.याबाबत सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांनी पुढाकार घेऊन सदर रस्त्याचे काम करून येथील नागरिकांना होणारा त्रास थांबवावा.अशी मागणी होत आहे.
याबाबत टेंडर प्रोसेस पूर्ण झाली असून संबंधित ठेकेदाराला सदर रस्त्याचे काम देण्यात आले आहे.काही अडचणी मुळे विलंब होत असून येत्या चार पाच दिवसात सदर काम सुरू करन्यात येईल.
श्रीकांत खोने
जिल्हा परिषद सदस्य दानापूर