• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मोदी यांनी माफी मागितली, प्रायश्चित्त कधी घेणार?; राहुल गांधींची टीका

Our Media by Our Media
December 3, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
94 1
0
राहुल गांधी
15
SHARES
676
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेताना माफी (मोदी माफी) मागितली आहे, पण आता ते प्रायश्चित कसे करणार? असा खडा सवाल राहुल गांधी यांनी केला. कृषी कायद्यांवरून गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर शरसंधान साधले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले. त्यावेळी त्यांनी आपण शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी माफी मागितली. याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली. त्यांनी ट्विट करून पंतप्रधानांवर टीका केली आहे.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, कृषी कायदे केले त्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागितली. आता त्यांनी संसदेला सांगावे की, प्रायश्चित कसे करणार. लखीमपूर खिरी प्रकरणावरून मंत्र्यांना कधी बरखास्त करणार? शहीद शेतकऱ्यांना भरपाई कधी देणार? किती देणार? आंदोलकांच्या विरोधात दाखल केलेल्या खोट्या केस कधी मागे घेणार? एमएसपीवर कायदा कधी करणार? याशिवाय ही माफी अपूर्ण आहे.

पहिल्याच दिवशी गोंधळात कायदा मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे मागे घेण्याची घोषणा भाषणातून केली होती. संसदेत हे कायदे मागे घेण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी प्रचंड गोंधळात कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी विधेयक मांडले. ते गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

भरपाईची मागणी

शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटना आणि विरोधक करत आहेत. मात्र वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी सरकारकडे नाही, त्यामुळे भरपाई कशी देणार असे उत्तर सरकारने संसदेत दिले.

पंतप्रधानांचे विरोधकांना आवाहन

कायदे मागे घेण्यपूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. संसदेचे हे सत्र अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून ते म्हणाले की, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्ताने देशाच्या विविध भागात रचनात्मक, सकारात्मक, जनहिताचे व राष्ट्रहिताचे कार्यक्रम साजरे केले जात आहेत. नुकताच देशाने संविधान दिवसदेखील साजरा केलेला आहे. अशावेळी होत असलेले संसदेचे हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोणी किती जोर लावून संसदेचे कामकाज थांबविले, यापेक्षा विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेऊन किती चांगले योगदान दिले, यावर संसद कामकाजाचे मूल्यमापन व्हावे. हिवाळी अधिवेशनात सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास सरकार बांधील आहे, असेही मोदी म्हणाले.

Tags: agriculture actNarendra Modirahul gandhi
Previous Post

कोरोना आणि डब्ल्यूएचओ बोगस, अकोल्याचे कालीपुत्र कालीचरण महाराजांचे वक्तव्य, वाचा सविस्तर

Next Post

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यभर आरोग्य दिन म्हणून साजरा

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
Anniversary of Marathi

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यभर आरोग्य दिन म्हणून साजरा

Wadegaon

वाडेगाव ग्रामपंचायतचा कचरा संकलणासाठी पुढाकार, गाव कचरामुक्त करण्याचा संकल्प

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.