• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 21, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिथे शेतकरी दुःखी तो देश कधीच प्रगती करत नाही : उर्मिला मातोंडकरांचा केंद्रावर निशाणा

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
जिथे शेतकरी दुःखी तो देश कधीच प्रगती करत नाही : उर्मिला मातोंडकरांचा केंद्रावर निशाणा
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात मंगळवारी शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक पुकारली आहे. देशभरातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भूमिका मांडताना शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली. ज्या देशातील शेतकरी दुःखी आहे तो देश कधीच प्रगती करत नाही. शेतकऱ्यांबाबत हे सरकार असंवेदनशील आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी भूमिका मांडली. “शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्याहून दुर्दैवी म्हणजे सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी वागणूक ही निष्ठूर आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. कुठल्याही देशातील शेतकरी जर दुःखी आहे, तर तिथला देश कधीच प्रगती करू शकणार नाही. तिथे नेहमीच समस्या राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे नेमके म्हणणे काय आहे हे ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे”, असे मत उर्मिला यांनी मांडले. “सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे. तसेच प्रसारमाध्यमांतून देखील अनेक वेगवगेळ्या बातम्या समोर येतात. ते नक्की शेतकरी आहेत का? त्यांचे कपडे, त्यांच्या वस्तू ते इंग्रजी कसे बोलतात?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

शेतकरी आपले घरदार सोडून अबालवृद्धांसह रस्त्यावर उतरले आहेत. थंडीत रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. त्यावरून शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात येतात. त्यामुळे सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे”, असे त्या म्हणाल्या. गेल्या १२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्राने आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत, ते रद्द करावेत, अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या बैठकीतही काहीच तोडगा न निघाल्याने भारत बंदची हाक पुकारण्यात आली. देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी याला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही या आंदोलना पाठिंबा दिला आहे. तर भाजपने आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

Tags: उर्मिला मातोंडकर
Previous Post

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वाडेगांव येथे १०० टक्के कडकडीत बंद

Next Post

अरुण लाड यांच्यासह ५ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
अरुण लाड यांच्यासह ५ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

अरुण लाड यांच्यासह ५ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवसा निमित्य अशोका फाउंडेशन बाळापुर च्या वतीने ब्लॅकेट वाटप

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवसा निमित्य अशोका फाउंडेशन बाळापुर च्या वतीने ब्लॅकेट वाटप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.