तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला जिल्हयात कोरोनाने हाहाकार माजवीला असून आकडा तीनशे पार गेला आहे अशातच आज अकोट तालुक्यातील अडगाव येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली असून आज तेल्हारा तालुक्यातील आठ संशयित अकोला रेफर करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार तेल्हारा तालुक्यात अद्याप कोरोनाचा शिरकाव झाला नसून तालुक्यात मुंबई येथून आलेल्या चार ग्रामीण भागातील तर चार शहरातील आठ जणांना खबरदारी म्हणून अकोला रेफर करण्यात आले असून त्यांचे swab नमुने घेण्यात येणार आहेत.अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक तापडिया यांनी अवर अकोला न्युज ला दिली आहे.याआधी सुद्धा तेल्हारा तालुक्यातील पाच संशयित खबरदारी म्हणून अकोला रेफर करण्यात आले होते मात्र त्यांचा अहवाल हा निगेटिव्ह आल्याने तेल्हारकरांनी सुटकेचा श्वास सोडला होता.मात्र आज पुन्हा आठ संशयित पाठवल्याने चिंतेत भर पडली आहे.