अकोला दि. 9 :- जिल्ह्यात दि. 6 व 7 मार्च या कालावधीत झालेल्या पाऊस व वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीत तेल्हारा तालुक्यातील सात गावामध्ये हरभरा, गहू, कांदा या पिकांचे अंदाजे 115 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
तसेच पातूर तालुक्यातील भंडारज बु. येथील अशोक तुकाराम इंगळे यांचे मालकीच्या 190 कोंबड्या मृत झाल्या आहेत, अशी माहिती नैसर्गिक आपत्ती कक्षातून प्राप्त झाली.