तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयसिंग भाऊ बलोदे यांच्या संकल्पनेतुन २४ वर्षांपूर्वी वैकुंठधाम या ऐतिहासिक अशा वास्तूची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर विदर्भात ह्या वास्तूला नावलौकिक सुद्धा मिळाले मात्र लोकप्रतिनिधी म्हणा की प्रशासन प्रतिनिधी सर्व काही साखरच कारण गेल्या अनेक वर्षांपासून ह्या वैकुंठधामची बिकट म्हणवल्यापेक्षा बेजार झालेली अशी परिस्थिती आहे लाखो काय निमार्ण झाल्या पासून जवळपास कोटी रुपये खर्ची केले.मात्र लोकप्रतिनिधी आणि न प प्रशासन यांच्याकडून ज्या पद्धतीने या ठिकाणी अंतीमसंस्कार व्हावा याबाबत तत्पर नाहीत कारण मानवाचा शेवट या ठिकाणीच होतो मात्र तरीही या ठिकाणी सुविधा पूरवण्यास अपयशी ठरले आहेत दरवषी या ठिकानाबद्दल टेंडर निघते मात्र त्याची अंबाबजावणी किती होते हे तर काम फक्त अन फक्त न प प्रशासनाचे आहे मात्र कुठल्या कारणाने डोळेझाक करीत आहे हा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
घटनाक्रम
आज जुन्या शहरातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला मात्र मृतदेहमागिल व्यक्तींना मोबाईल च्या टॉर्च वर मार्ग काढावा लागला हेच होत नाही तर मृतदेहाला मुखाग्नी देतांना सुद्धा अनेकांना आपल्या मोबाईल चा टॉर्च चालू ठेऊन सरण मांडून मुखाग्नी द्यावा लागला हे न प तसेच लोकप्रतिनिधी यांच्या साठी लाजिरवाणी बाब आहे कारण ज्या ठिकाणी व्यक्तीचा शेवट जर सर्व व्यवथा असुन सुद्धा व्यवस्थित पार पडत नसणार तर हा प्रश्न अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित करणारी आहे. कारण वैकुंठधाम हे अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी अनेक जमिनीवर सरपटणारे जीव असतात त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण राहणार हा सुद्धा अंतीमसंस्कार मध्ये उपस्थित नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला.
प्रतिक्रिया
मी याबाबद्दल माझ्या स्तरावर काम करीत असून येत्या दोन दिवसात वैकुंठधाम येथील संपुर्ण व्यवस्था करण्यात येईल.
श्री गावंडे
मुख्याधिकारी न प तेल्हारा