तेल्हारा (प्रा. विकास दामोदर ) :- तेल्हारा तालुक्यासह लंम्पी आजाराने जिल्हा भर थैमान घातला असून या आजाराने अनेक जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांना जोड व्यवसाय व शेतीकामात महत्त्वाची भूमिका ही या जनावरांच्या माध्यमातून निभावल्या जाते. पण जिल्हाभर जनावरावर लंपी नावाच्या या आजाराने ग्रासले असून त्यात अनेक जनावरे ही दगावली आहेत. अगोदरच शेतकऱ्यावर अस्मानी संकट ओढले असून अतिवृष्टीमुळे शेतातील पिके पाण्याखाली आली आहेत.
त्यात जोडधंदा म्हणून शेतकरी बांधवांना त्यांच्याकडील जनावरांच्या माध्यमातून संसार चालवण्यासाठी जनावरे मोठ्या प्रमाणात दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असून शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे अशा संकटात शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे.
दगावलेल्या जनावरांचे मोबदल्यात शेतकऱ्यांना जनावरांच्या बाजारभावाने मदत करावी अशी मागणी तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोक दारोकार यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे तहसीलदारांना करण्यात आली. यावेळी मधुसूदन बरिंगे महासचिव, पद्माताई गवार गुरु, बरकत उल्ला खा संघटक, जिया शहा ता. अ. युवक आघाडी, विकास पवार शहराध्यक्ष, मनीष राहाटे, कोषाध्यक्ष, संजय हिवराळे गट नेते पं.सं. तेल्हारा. मोहम्मद ईद्रिश, पं.सं. तेल्हारा, सौ. माधुरीताई हीवराळे, सौ. कल्पनाताई हीवराळे, सौ. प्रमिलाताई गवई, सौ. सुज्ञान खंडेराव, आनंद बोदळे, रोशन दारोकार, सुरेंद्र भोजने, संदीप गवई, गजानन तायडे, महादेव नागे, सदानंद खंडेराव, रामदास वाकोडे, दीपक बावस्कर विजय मोहोड, बाळकृष्ण भगेवार, गजानन बोदळे, प्रकाश बोदडे, विलास मनतकार, देवानंद मोहोड, प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ गवारगुरू इत्यादी उपस्थित होते.