म्हैसांग (प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील आपातापा फिल्ड वीज वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या भोंगळ कारभारामुळे म्हैसांग, कट्यार, गोनापूर, मजलापूर, रामगाव, आपातापा या गावातील नागरिकांना काही कारण नसतांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आहे.
काही कारण नसतांना येणं उन्हाळ्यात वीजपुरवठा दिवसभर खंडित होतो, त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. या कार्यालयाचा कारभार अतिरिक्त अभियंता यांच्या भरवशावर सुरू आहे,तरी येथे पूर्णवेळ अधिकारी वर्गाची नेमणूक करा, अशी नागरिक मागणी करत आहे.
तसेच कर्मचारी हे मद्यपान करून कामावर येतात. तरी यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि वरीष्ठ वीज वितरण अधिकारी यांनी या भोंगळ कारभाराकडे लक्ष द्यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल देशमुख, गुड्डु गावंडे,वसंता कर्णकार, रितेश काळे, रामेश्वर बावणे, मिथुन गवई, सुनील देशमुख, अंकित कुटास्कर, उमेश पवार, अविनाश भामोद्रे, उमेश वानखडे, धीरज गावंडे, आशिष लव्हाळे, आकाश पिपरे, रुपेश काट्यारमन, ऋषीं देशमुख, दिनेश जैस्वाल, सागर देशमुख, राहूल राऊत, अशोकराव देशमुख, गुलाब लव्हाळे.